Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: #AgnipathRecruitmentScheme अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही; 24 जूनपासून सुरु होणार भरती : भारतीय लष्कर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

#AgnipathRecruitmentScheme अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही; 24 जूनपासून सुरु होणार भरती : भारतीय लष्कर

Surajya Digital
Last updated: 2022/06/19 at 7:20 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

● ‘अग्निपथ’ बाबत तिन्ही लष्करप्रमुखांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : अग्निपथ योजना मागे घेण्याची कोणतीही शक्यता भारतीय सैन्याने फेटाळून लावली आहे. अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही, असे लष्कराने संयुक्त निवेदनात म्हटले आहे. कोचिंग क्लासेसचे संचालक विद्यार्थ्यांना चिथावणी देत आहेत. युवकांनी हिंसाचार आणि निदर्शनात भाग घेऊ नये. एफआयआरमध्ये नाव असल्यास अग्निवीर म्हणून नाव नोंदवता येणार नाही, असे लष्कराने संयुक्त निवेदनात जाहीर केले. The Agneepath scheme will not be withdrawn; Recruitment will start from June 24: Indian Army

Contents
● ‘अग्निपथ’ बाबत तिन्ही लष्करप्रमुखांची मोठी घोषणास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

‘अग्निपथ’ बाबत तिन्ही लष्करप्रमुखांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सांगण्यात आले की, अग्निवीरांना समान भत्ता मिळेल जो सध्या कार्यरत असलेल्या नियमित सैनिकांना लागू आहे. त्यांच्याशी सेवेच्या बाबतीत कोणताही भेदभाव केला जाणार नाही. लष्करी जवान जे कपडे घालतात तेच कपडे अग्निवीर घालतील, तर ज्या लंगरमध्ये सैनिक जेवतात, ते अग्निवीर खातील. जिथे सैन्याचे सैनिक राहतात तिथे अग्निवीर राहतील.

‘अग्निपथ’ योजनेबाबत एअर मार्शल एसके झा पत्रकार परिषदेत म्हणाले की, भारतीय वायुसेनेमध्ये अग्निवीरांची पहिली तुकडी घेण्याची प्रक्रिया 24 जूनपासून सुरू होईल. ही एक ऑनलाइन प्रणाली आहे. त्या अंतर्गत नोंदणी सुरू होईल. एक महिन्यानंतर 24 जुलैपासून पहिला टप्पा ऑनलाइन परीक्षा सुरू होणार आहेत. डिसेंबरअखेर अग्निवीरची पहिली तुकडी हवाई दलात दाखल होईल. बॅचचे प्रशिक्षण 30 डिसेंबरपूर्वी सुरू होईल. ही सुधारणा या आधीच होणं आवश्यक होतं, 1989 साली यावर काम सुरू झालं होतं असं लष्कराच्या वतीनं सांगण्यात आलं.

भरती प्रक्रिया तातडीने सुरू होणार असून त्यासाठी प्रत्येक युवकाला भरतीआधी हिंसा, तोडफोडीत सहभागी नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार असल्याची माहिती लष्कराच्या वतीनं देण्यात आली.पोलीस व्हेरिफिकेशन हे शंभर टक्के करावं लागणार, ते असल्याशिवाय अग्निवीरांना सेवा जॉईन करता येणार नाही. सेनेच्या तीनही सेना दलांच्या वतीनं आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये बोलताना लेफ्टनंट जनरल अनिल पुरींनी ही माहिती दिली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

केंद्राने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभरातील अनेक ठिकाणी युवकांची निदर्शनं सुरू आहेत. बिहारमध्ये तर युवकांच्या आंदोलनाला हिंसक रुप प्राप्त झालं असून अनेक रेल्वेंना आग लावल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर केंद्र सरकारने या योजनेसाठी वयोमर्यादा आणखी दोन वर्षांनी वाढवली. तर संरक्षण मंत्रालय तसेच कोस्ट गार्डने या अग्निवीरांसाठी 10 टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज सेनेच्या तीनही दलांकडून आज संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.

येत्या 2030 सालापर्यंत 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षांच्या आतील असेल. त्यामुळे लष्कराला जोश आणि होश यांचं कॉम्बिनेशन असलेल्या युवकांची गरज आहे. झालेल्या बैठकीत अग्निवीरांना संरक्षण मंत्रालयाच्या नागरी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोस्ट गार्ड आणि डिफेन्स पीएसयूमध्येही 10 टक्के कोटा दिला जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी संरक्षण मंत्रालयातील नोकऱ्यांच्या 10 टक्के जागा राखीव ठेवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. भारतीय तटरक्षक आणि संरक्षण नागरी पदे आणि सर्व 16 संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये 10 टक्के आरक्षण लागू केले जाईल, असेही संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. हे आरक्षण माजी सैनिकांसाठीच्या सध्याच्या आरक्षणाव्यतिरिक्त असणार आहे.

अग्निपथ योजनेअंतर्गत, भारतीय वायुसेना 24 जूनपासून भरती मोहीम सुरु करणार आहे. त्यानंतर लवकरच भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी केली जाईल. लष्करातील भरती प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून विद्यार्थ्यांनी त्यासाठी तयारी सुरु करावी, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. तरुणांच्या भवितव्याबद्दलची काळजी आणि संवेदनशीलतेबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो असे सिंह म्हणाले.

सैन्यात भरतीची प्रक्रिया काही दिवसांत सुरु होणार आहे. त्यांनी आपले काम सुरु करावे. त्यासाठी तयारी सुरु करावी असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले. तरुणांचे भविष्य डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मोदींच्या सूचनेनुसार सरकारने अग्निवीर भरतीची वयोमर्यादा यावेळी 21 वर्षावरुन 23 वर्षे केली आहे. यामुळे अनेक तरुण अग्निवीर योजनेसाठी पात्र होणार आहेत.

 

 

You Might Also Like

रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?

आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत

उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

कमर्शिअल सिलेंडर स्वस्त; घरगुती गॅसच्या दरात बदल नाही

अमेरिकेचा भारतावर २५% टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू; कॅनडावर आजपासून ३५% शुल्क

TAGGED: #Agneepathscheme #notbe #withdrawn #Recruitment #start #June24 #Indian #Army #AgnipathRecruitmentScheme, #अग्निपथ #योजना #मागे #अग्निवीर #24जूनपासून #भरती #भारतीय #लष्कर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगोला आणि पंढरपुरातील तीन टोळ्यातील नऊजण तडीपार
Next Article IndiaBook App जळगावच्या तरूणाने बनवले फेसबुकच्या तोडीचे ‘इंडिया बुक’ नावाचे देशी ॲप

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?