Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राष्ट्रवादीच्या ‘मिशन घरवापसी’वर आशिष शेलारांची टीका; आधी आपले घर सांभाळा, नंतर भाजपावर बोला
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीच्या ‘मिशन घरवापसी’वर आशिष शेलारांची टीका; आधी आपले घर सांभाळा, नंतर भाजपावर बोला

Surajya Digital
Last updated: 2020/08/14 at 12:18 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपामध्ये गेलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते ‘मिशन घरवापसी’च्या मोहिमेचा प्रचार करत आहेत. यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला पार्थच्या वादाच्या संदर्भात, राष्ट्रवादीने आधी आपले घर सांभाळावे, नंतर भाजपाबाबत बोलावे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

शेलार म्हणालेत, राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातले मतभेद लपवण्यासाठी भाजपात गेलेले आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवते आहे. आपला पक्ष फुटू नये म्हणून राष्ट्रवादीचे नेते या अफवा पसरवत आहेत; पण त्यांच्या या प्रयत्नाला यश मिळणार नाही. जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात संवाद साधला तरी खूप आहे, असा टोमणा त्यांनी मारला.

पण नुकतेच काही दिवसांपूर्वी आशिष शेलार यांनी पवारांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. हा फोटो सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावर टाकला होता. यावर शेलार कमळ टाकून घड्याळ हातावर बांधणार अशी चर्चा सुरु झाली होती. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही भेट मतदारसंघातील अडचणीसाठी होती, असे सांगून राष्ट्रवादीची हवा काढून घेतली. पण आता पार्थ पवार प्रकरणात आशिष शेलार यांनी केलेली टीका म्हणजे शेलार हे भाजपातच राहणार हे ठळकपणे दिसून येत आहे.

आधी सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवा, असा टोमणा मारून शेलार म्हणालेत, भाजपाला ना कोणाचा परिवार फोडण्याची इच्छा नाही ना सरकार पाडापाडीत रस आहे. सध्या पार्थ पवार यांच्याबाबत वाद सुरू आहेत.  याबाबत राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक म्हणालेत, पार्थ तरुण नेते आहेत. त्यांचा अनुभव कमी. त्यांचे वक्तव्य गांभीर्याने घेण्यासारखे नाही. तरुणांकडून चुका होतात, त्यात सुधारणा करता येतात.

You Might Also Like

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत

राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक

TAGGED: #आशिषशेलार #घरसांभाळा #टीका #पवार #भाजप #राष्ट्रवादी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत गुरुवारी 15 मृत्यू, तर नव्याने 313 रुग्ण, कोरोना रुग्णसंख्या साडेपाचहजार पार तर मृत्यू 191
Next Article मोहोळजवळ दिसला बिबट्या; वनखात्याचा दुजोरा, चिंता वाढली

Latest News

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन
सोलापूर June 28, 2025
पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा
महाराष्ट्र June 28, 2025
एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र June 28, 2025
दूध व्यवसायात महिलांचे मोठे योगदान – बाळासाहेब थोरात
Top News June 28, 2025
वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद
महाराष्ट्र June 28, 2025
पासपोर्ट सेवा २.० लाँच, पोलीस पडताळणीलाही लागणार कमी वेळ
Top News June 28, 2025
‘विद्यार्थी दशा आणि दिशा’ एक महत्त्वपूर्ण उपक्रम – उदय सामंत
महाराष्ट्र June 28, 2025
राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर एसटीच्या जागेवर उभारले जाणार – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र June 28, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?