Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सर्वोच्च न्यायालयाने NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली; परीक्षा होणारच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

सर्वोच्च न्यायालयाने NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली; परीक्षा होणारच

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 2:39 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे परीक्षा घेण्यावरून देशात वादंग सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली आहे. काही दिवसापूर्वी, कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा घेणे धोकादायक होऊ शकते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशा मागणीची याचिका विद्यार्थ्यांनी न्यायालयात दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

ॲड. अलाख अलोक श्रीवास्तव यांनी ११ विद्यार्थ्यांच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी याचिका दाखल केली होती. कोरोनाच्या काळात सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असताना NEET आणि JEE घेणे धोक्याचे ठरू शकते, असे या याचिकेत म्हटले होते. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजंन्सीने सुनावणीदरम्यान कोर्टात परीक्षा घेताना सर्व काळजी घेतली जाईल असा दावा केल्यानंतर ही मागणी फेटाळण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२० रोजी JEE परीक्षा होणार आहे. तर, NEET परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

कोरोना संकट असले तरी देशाचा कारभार ठप्प झालेला नाही. आवश्यक ती खबरदारी घेऊन कारभार चालवला जात आहे. त्यामुळे नीट आणि जेईई मेन या दोन्ही परीक्षा पुरेश्या खबरदारीसह घेता येतील, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांचे वर्ष वाया जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे. यंदा नीट परीक्षेसाठी १५ लाख ९३ हजार ४५२ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षेसाठी नेहमीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त परीक्षा केंद्र असतील. कोरोना संकट असल्यामुळे मास्क, सोशल डिस्टंसचे बंधन असेल. सर्व परीक्षा केंद्र निर्जंतूक केली जातील तसेच विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रांवरील प्रशासकीय यंत्रणेसाठी सॅनिटायझर आणि आरोग्य तपासणी तसेच तब्येत बिघडल्यास तातडीने वैद्यकीय मदत देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

नीट आणि जेईई मेन परीक्षा देणार असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांचे पालक आखाती देशांमध्ये नोकऱ्या करत आहेत. अशा पालकांनी एकत्र येऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. याआधी केरळच्या उच्च न्यायालयात अशा स्वरुपाची याचिका दाखल झाली होती. मात्र केरळच्या उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यानंतर पालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयानेही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.

You Might Also Like

रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?

आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत

उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

कमर्शिअल सिलेंडर स्वस्त; घरगुती गॅसच्या दरात बदल नाही

अमेरिकेचा भारतावर २५% टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू; कॅनडावर आजपासून ३५% शुल्क

TAGGED: #सर्वौच्चन्यायालय #neet-jee #याचिकाफेटाळली #परीक्षा #होणारच
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आसरा चौकात 21 लाखांचा 50 पोती गुटखा पकडला; दोघांना घेतले ताब्यात
Next Article संजय राऊतांच्या वक्तव्यामुळे डॉक्टर उतरणार रस्त्यावर; मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मार्डने दिला इशारा

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?