Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस; खरीप पिकांना दिलासा, मात्र शेतीकामात अडथळा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस; खरीप पिकांना दिलासा, मात्र शेतीकामात अडथळा

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 5:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. आज सोमवारी देखील पुन्हा अनेक भागात पाऊस कायम आहे. खरीप पिकांना हा पडणारा पाऊस पोषक असला, तरी रोजच पाऊस होत असल्याने शेतीकामात अडथळे येत आहेत. आजही दिवसभर कधी ढगाळ, कधी ऊन तर कुठे हलका पाऊस असे वातावरण आहे.

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. पण त्यात फारसा जोर नव्हता. शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस सुरु आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यानंतर सोमवारीही पहाटेपासूनच त्याने अनेक भागात हजेरी लावली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पावसाचे वातावरण असल्याने अनेक भागात साडेनऊ नंतरच ऊन पडले. पण त्यानंतरही कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील सर्व भागात सर्वदूर पावसाची अशीच काहीशी स्थिती होती.

दरम्यान, सततच्या या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत असला, तरी शेतीकामात मात्र अडथळा येत आहे. अनेक भागात सध्या मूगाची काढणी सुरु आहे. काही ठिकाणी अन्य पिकात खुरपणीची कामे सुरु आहेत. पण सततच्या पावसाने शेतीची कामे थांबली आहेत.

* शेतीची कामे थांबली

शुक्रवारपासून भीजपाऊस चालू आहे. पाऊस उघडीप घेण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतात दलदल निर्माण झाली आहे. वापसा झाले नसल्याने शेतीची मेहनत थांबली आहे. ऊसासाठी सरी सोडणे, पाळी मारणे, कांद्यांची लावण, रोप टाकणे, टाकले तर अतिपावसाने पिवळे पडत आहे. अति पावसामुळे अनेक शेतीकामे थांबली आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #भीजपाऊस #खरीपचांगला #शेतीकामाला #अडथळा #रिपरिप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदारकीपेक्षा मला शेतकर्‍याची दूधदरवाढ महत्वाची; जनावरांसह काढला मोर्चा
Next Article पंतप्रधान मोदी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान करतात, तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?