Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस; खरीप पिकांना दिलासा, मात्र शेतीकामात अडथळा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस; खरीप पिकांना दिलासा, मात्र शेतीकामात अडथळा

Surajya Digital
Last updated: 2020/08/17 at 5:19 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. आज सोमवारी देखील पुन्हा अनेक भागात पाऊस कायम आहे. खरीप पिकांना हा पडणारा पाऊस पोषक असला, तरी रोजच पाऊस होत असल्याने शेतीकामात अडथळे येत आहेत. आजही दिवसभर कधी ढगाळ, कधी ऊन तर कुठे हलका पाऊस असे वातावरण आहे.

अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा सुरुवात केली. पण त्यात फारसा जोर नव्हता. शुक्रवारपासून जिल्ह्यात अनेक भागात रोज भीजपाऊस सुरु आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच आहे. त्यानंतर सोमवारीही पहाटेपासूनच त्याने अनेक भागात हजेरी लावली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पावसाचे वातावरण असल्याने अनेक भागात साडेनऊ नंतरच ऊन पडले. पण त्यानंतरही कधी ऊन, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील सर्व भागात सर्वदूर पावसाची अशीच काहीशी स्थिती होती.

दरम्यान, सततच्या या पावसामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत असला, तरी शेतीकामात मात्र अडथळा येत आहे. अनेक भागात सध्या मूगाची काढणी सुरु आहे. काही ठिकाणी अन्य पिकात खुरपणीची कामे सुरु आहेत. पण सततच्या पावसाने शेतीची कामे थांबली आहेत.

* शेतीची कामे थांबली

शुक्रवारपासून भीजपाऊस चालू आहे. पाऊस उघडीप घेण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे शेतात दलदल निर्माण झाली आहे. वापसा झाले नसल्याने शेतीची मेहनत थांबली आहे. ऊसासाठी सरी सोडणे, पाळी मारणे, कांद्यांची लावण, रोप टाकणे, टाकले तर अतिपावसाने पिवळे पडत आहे. अति पावसामुळे अनेक शेतीकामे थांबली आहेत.

You Might Also Like

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर एमआयडीसीत 56 बेकायदा बांधकामे

सोलापुरात इतर आजारांसाठी दाखल रुग्णांपैकी 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

उजनी धरणात मुसळधार पावसामुळे अवघ्या ३ दिवसांत 12 टीएमसी पाणीसाठा;

TAGGED: #भीजपाऊस #खरीपचांगला #शेतीकामाला #अडथळा #रिपरिप
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आमदारकीपेक्षा मला शेतकर्‍याची दूधदरवाढ महत्वाची; जनावरांसह काढला मोर्चा
Next Article पंतप्रधान मोदी लंडनमध्ये जाऊन डॉक्टरांचा अपमान करतात, तेव्हा विरोध करणाऱ्या संघटना कुठे होत्या

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?