Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीत हृदयद्रावक घटना; विहिरीत उडी टाकली, गेला तिघांचा जीव
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

बार्शीत हृदयद्रावक घटना; विहिरीत उडी टाकली, गेला तिघांचा जीव

Surajya Digital
Last updated: 2022/09/30 at 9:00 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सोलापूर : एका विवाहितेने पोटच्या दोन चिमुरड्यांना घेऊन स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज शुक्रवारी (ता.30) सकाळच्या सुमारास बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे घडली. A Heartbreaking Incident in the Rain; Jumped into the well, lost three lives Solapur

 

रोहिणी ऊर्फ अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २२), अनिष बाबासाहेब काशिद (वय दीड वर्ष) व अक्षरा बाबासाहेब काशीद (वय चार महिने) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. विद्युत मोटारी लावून सायंकाळी चार वाजता तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

 

नोव्हेंबर २०१९ मध्ये बाबासाहेब काशीद यांनी खडकोणी येथील दिलीप शिंदे यांची मुलगी रोहिणी ऊर्फ अनुराधा हिच्याशी दुसरा विवाह केला. आज शुक्रवारी पती बाबासाहेब हे कामानिमित्त तर सासरे प्रभाकर हे बार्शीला बँकेतून पगार आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, रोहिणी हिने सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास दोन चिमुरड्यांना घेऊन उडी घेऊन आत्महत्या केली.

 

कुसळंब येथील बाबासाहेब काशीद यांची पहिली पत्नी अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २३) हिने आदिती काशीद (वय ५) व अक्षरा काशीद (वय ३) या दोन मुलींना स्वत:च्या कमरेला साडीने बांधून घेऊन २७ जुलै २०१७ रोजी स्वत:च्या शेतातील त्याच विहिरीत आत्महत्या केली होती. तेव्हा जाचहाट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

□ सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 

माळशिरस : माण तालुक्यातील म्हसवडमध्ये सराफ व्यावसायिकाला फिल्मी स्टाईलने लुटणार्‍या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. म्हसवडमधील एक सोनारच गुन्ह्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.

 

सातारा जिल्ह्यातील सेवेचा अनुभव असणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सपोनि रमेश गर्जे यांनी म्हसवड येथील सोने प्रकरणाच्या चोरीचा छडा लावला आहे. तांत्रिक मुद्दे आणि खबऱ्यांचे मजबूत नेटवर्क यामुळे सोने व्यापाऱ्याला लुटण्याचा डाव उघडकीस आला असून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

त्यांच्याकडून ४३५ ग्रॅम सोन्यासह सुझुकी कार, स्प्लेंडर मोटारसायकल, पिस्टल, चाकू असा एकूण १७ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुर्वां उर्फ दुर्योधन नाना कोळेकर (वय ३४), रणजित भाऊ कोळेकर (वय २०), राहणार धुळदेव, तालुका माण, योगेश तुकाराम बरडे (वय ३५), राहणार पिलीव रोड बरडे वस्ती माळशिरस, जिल्हा सोलापूर आणि रामदास विठ्ठल गोरे (वय २०), राहणार मासाळवाडी, तालुका माण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरलेला सोन्याचा ऐवज, तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने, पिस्टल आणि चाकू, असा एकूण १७ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. म्हसवड न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

□ गुन्ह्यात स्थानिक सोनाराचा हात

सराफ व्यावसायिकाच्या येण्या – जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तसेच स्थानिक सोनाराने माळशिरस, धुळदेव मासाळवाडी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

TAGGED: #Heartbreaking #Incident #Rain #Jumped #well #lost #three #lives #Solapur, #बार्शी #कुसळंब #हृदयद्रावक #घटना #विहिरी #उडी #तिघांचा #जीव #सोलापूर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘मला प्रशिक्षण द्या, जरा ज्ञानात भर पाडून घेतो’
Next Article विधवेने सौभाग्याचे लेणे लावले सुप्रियाताईंच्या भाळी

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?