Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिवाळीपूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या; सिद्धाराम म्हेत्रेंचे महसूलमंत्र्यांना साकडे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

दिवाळीपूर्वी तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्या; सिद्धाराम म्हेत्रेंचे महसूलमंत्र्यांना साकडे

Surajya Digital
Last updated: 2022/10/18 at 9:14 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
¤ महसूलमंत्र्यांची सकारात्मकता – जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कळवणारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ महसूलमंत्र्यांचे आश्वासन

¤ महसूलमंत्र्यांची सकारात्मकता – जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कळवणार

 

अक्कलकोट : दिवाळीपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्याचे साकडे सिद्धाराम म्हेत्रे यांनी पालकमंत्र्यांना घातले आहे. Give justice to Taluka farmers before Diwali; Siddharam Mhetre’s letter to the Revenue Minister Guardian Minister Radhakrishna Vikhe-Patil

संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व पिकांचे पंचनामे झाल्यानंतर तालुक्याला अतिवृष्टीचा निधी मिळाला आहे. याव्यतिरिक्त शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिकांच्या जोखमेपोटी हप्ता भरला आहे. प्रशासनाकडून अक्कलकोट तालुक्यातील फक्त तीन मंडळातील भुईमूग पिकासाठी विमा कंपन्यांनी ॲग्रिम रक्कम द्यावी, असे आदेश दिले आहेत. हा आदेश चुकीचा आहे.

 

अक्कलकोट तालुक्यातील सर्व मंडलातील विमाधारक शेतकऱ्यांना खरीपातील सर्व पिकांच्या जोखमेपोटी विमा कंपनीकडून दिवाळीपूर्वी ॲग्रिम रक्कम देण्याविषयी आदेश द्यावेत, अशी मागणी माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी राज्याचे महसूलमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली.

 

याविषयी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे म्हणाले की, अक्कलकोट तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण खरीप पिकांवर अवलंबून आहे. मात्र यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, भुईमूग, उडीद, मूग यासह इतर पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

अडचणीतील शेतकऱ्यांना एनडीआरएफ योजनेतून अतिवृष्टीचा निधी मिळाला आहे. यावरून तालुक्यात झालेल्या नुकसानीची स्पष्टता दिसून येत आहे. दिवाळीपूर्वीच शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र जिल्हा कृषी कार्यालयाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने अक्कलकोट तालुक्यातील फक्त मैंदर्गी, वागदरी व अक्कलकोट महसूल मंडलातील भुईमूग पिकासाठी विमा कंपन्यांनी ॲग्रिम स्वरूपात रक्कम देण्याविषयी आदेश दिले आहेत.

वास्तविक संपूर्ण अक्कलकोट तालुक्यात मोठे नुकसान झाल्याने खरीपातील सर्व पिकांच्या जोखमेपोटी विमा कंपनीकडून दिवाळीपूर्वी ॲग्रिम स्वरूपात रक्कम देण्याविषयी आदेश द्यावेत यासाठी महसूलमंत्र्यांकडे निवेदन दिल्याचे सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले उपस्थित होते.

 

□ महसूलमंत्र्यांचे आश्वासन

अक्कलकोट तालुक्यातील सर्व मंडळातील शेतकऱ्यांना पीक विम्याची ॲग्रीम रक्कम मिळावी यासाठी सिद्धाराम म्हेत्रे यांनी निवेदन दिल्यानंतर लागलीच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना याबाबत तातडीने संपर्क साधणार असल्याचे सांगितले. दिवाळीपूर्वी अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आवश्यक सहकार्य करणार असल्याचे आश्वासन दिले.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #justice #Taluka #farmers #Diwali #SiddharamMhetre's #letter #RevenueMinister #GuardianMinister #RadhakrishnaVikhe-Patil, #अक्कलकोट #दिवाळी #तालुका #शेतकरी #न्याय #माजीमंत्री #सिद्धारामम्हेत्रे #महसूलमंत्री #पालकमंत्री #विखे-पाटील #साकडे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर । सुनिल नगरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा खून
Next Article अजितदादांमागे पुन्हा ईडीची पीडा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?