Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गोव्याचे राज्यपाल मलिक यांची बदली; महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे गोव्याच्या राज्यपालाचा अतिरिक्त प्रभार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

गोव्याचे राज्यपाल मलिक यांची बदली; महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे गोव्याच्या राज्यपालाचा अतिरिक्त प्रभार

Surajya Digital
Last updated: 2020/08/18 at 3:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे गोव्याच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला आहे. गोवा राज्याचे विद्यमान राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली झाल्याने कोश्यारींकडे अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भगतसिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राचे राज्यपाल होऊन पुढील महिन्याच्या सप्टेंबरला वर्ष होणार आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची बदली मेघालयच्या राज्यपालपदी करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बदलीच्या पत्रकावर स्वाक्षरी केली आहे.  सत्यपाल मलिक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. 25 ऑक्टोबर 2019  रोजी गोव्याच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 काळात जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा कलम 370 रद्द करण्याचा घटनात्मक निर्णय ऑगस्ट 2019 मध्ये घेण्यात आला होता.

1974 ते 1977 दरम्यान त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत आमदारकी भूषवली. 1980 ते 86 मध्ये त्यांनी राज्यसभेवर उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले. तर 1989 ते 1991 दरम्यान ते जनता दलाकडून अलिगढचे लोकसभा खासदार होते. ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2018  दरम्यान ते बिहारचे राज्यपाल होते.

* भगतसिंह कोश्यारी यांच्याविषयी

भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे 5 सप्टेंबर 2019 रोजी महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. कोश्यारी यांची भूमिका महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात महत्त्वाची राहिली आहे.

भगतसिंह कोश्यारी यांचा जन्म 17 जून 1942  रोजी झाला. कोश्यारी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत असून भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेते आहेत. आणीबाणीच्या काळात 1977  मध्ये त्यांनी तुरुंगवारीही भोगली आहे. 79 वर्षीय भगतसिंह कोश्यारी यांनी इंग्रजी साहित्य विषयात पदवी संपादन केली आहे. व्यवसायाने ते शिक्षक आणि पत्रकारही होते.

उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2001-02 या काळात ते उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते. 2002 ते  2007 या काळात उत्तराखंड विधानसभेच्या विरोधीपक्ष नेतेपदी त्यांची वर्णी लागली होती. 2008  ते 2014  या काळात ते राज्यसभेचे खासदार होते. तर 2014  मध्ये ते नैनिताल-उधमसिंग नगर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले होते.

You Might Also Like

रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत

काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री

उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

TAGGED: #भगतसिंह #कोश्यारी #गोवा #महाराष्ट्र #राज्यापाल #अतिरिक्त #प्रभार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना विनम्र श्रद्धांजली; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
Next Article “आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही तसंच त्यांना कधीही भेटले नाही”

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?