Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गृहमंत्र्यांनी केले स्वागत; मात्र निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या प्रश्नाला दिली बगल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

गृहमंत्र्यांनी केले स्वागत; मात्र निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या प्रश्नाला दिली बगल

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 9:15 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं असून, सीबीआयला हवं ते सहकार्य सरकारकडून करण्यात येईल, असं त्यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याची मागणी होत असताना अनिल देशमुख ठामपणे मुंबई पोलिसांच्या पाठीशी उभे राहिले होते. यावेळीही त्यांनी ‘मुंबई पोलिसांनी अत्यंत चांगली कामगिरी केली असून न्यायालयानंही तपासात दोष आढळला नसल्याचं म्हटलं आहे आणि मुंबई पोलिसांसाठी ही अभिमानाची बाब आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

‘सुशांतसिंह आत्महत्येप्रकरणी विरोधी पक्षातील नेते राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे. बिहारमध्ये लवकरच निवडणूका होणार आहेत त्या अनुषंगानेचं राजकारण केले जात आहे,’ असाही पुनरुच्चार त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर राज्य सरकार पुनर्विचार याचिका दाखल करणार करणार का हा प्रश्न विचारला असता, त्यांनी याबाबत उत्तर देणं टाळलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांची पाठराखण केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा व्यावसायिक पद्धतीनं तपास करत आहेत. सर्व बाजू तपासून पाहिल्या जात आहेत. त्यामुळं सीबीआय तपासाची गरज नाही, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. याबाबतीत कुणीही राजकारण करू नये, असं त्यांनी विरोधकांना सुनावलं होतं.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

TAGGED: #गृहमंत्री #देशमुख #न्यायालयनिर्णय #स्वागत #बगल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रुग्णालयात उपचारासाठी जाताना संजय दत्त झाला भावूक; ‘माझ्यासाठी प्रार्थना करा’ असे केले आवाहन
Next Article राजू शेट्टींची 27 ऑगस्टला दूध दरवाढीसाठी बारामतीला धडक; सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?