Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

कॅन्सरमुळे जवळची माणसं गमावलेल्या शास्त्रज्ञाने शोधले सेंद्रीय खत

Surajya Digital
Last updated: 2023/01/25 at 6:05 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ माळशिरस तालुक्यातील दसूर च्या शेतकऱ्याकडे गव्हावर प्रयोग□ उत्तर भारतीयांची मक्तेदारी मोडीत, जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात करतील■ संशोधनाची किमयास्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

□ माळशिरस तालुक्यातील दसूर च्या शेतकऱ्याकडे गव्हावर प्रयोग

□ उत्तर भारतीयांची मक्तेदारी मोडीत, जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात करतील

सोलापूर – सोलापुरी चादरी आणि कडक भाकरीसाठी राज्यात प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात ज्वारीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होते.  Scientist who lost loved ones to cancer discovers organic fertilizer Malshiras Research Alchemy पण, सोलापूर जिल्ह्यातले शेतकरी भविष्यात गव्हाची निर्यात मोठया प्रमाणावर करतील, असं तुम्हाला सांगितलं तर… तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे शक्य आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यातील दसूर येथील शेतकरी सुभाष कागदे यांच्या शेतात याबाबतचा प्रयोग देखील सुरू आहे.गुजरातमधल्या सुरतचे डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी त्यांच्या प्रदीर्घ संशोधनातून ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या सेंद्रीय खताची निर्मिती केली आहे. सेंद्रीय शेतीचा पर्याय अवलंबला तर येत्या काळात सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी देखील आपल्या गव्हाची निर्यात देशभर करू शकतात. गव्हाच्या निर्यातीमध्ये उत्तर भारतामधील राज्यांची मक्तेदारी आहे. बाहेरच्या देशामध्येही याला मोठी मागणी आहे. उत्पादन वाढीच्या शर्यतीमध्ये हे शेतकरी रासायनिक खतांचा वापर करून जमीनीचा कस आणि आरोग्यास धोका निर्माण झाले आहेत.

■ संशोधनाची किमया

 

माळशिरस तालुक्यातील दसूर या गावातील शेतकरी सुभाष कागदे यांनी या सेंद्रिय खताची चाचणी घेण्यासाठी त्यांच्या शेतात दोन भाग केले. त्यापैकी एक एकरमध्ये त्यांनी रासायनिक खत टाकून गहू लावला. त्याला अद्याप लोंब्या आल्या नाही आणि वाढही झाली नाही तर चार एकर मध्ये ‘जैनम चरखा’ आणि ‘क्रांती’ या खताचा वापर केली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

एकाच दिवशी लावलेल्या या दोन्ही पिकांपैकी सेंद्रीय खत वापरलेला गहू या पिकाला आता मोठ्या लोंब्या पाहायला मिळत आहेत. रासायनिक प्रकारे पिकवलेल्या गव्हामध्ये अजूनही हा बदल झालेला नाही. डॉ. सलीम चेन्नीवाला यांनी मोठ्या संशोधनानंतर जैनम चरखा आणि क्रांती हे प्रॉडक्ट बनवलंय.

अनेक वर्षांची मेहनत, जिद्द आणि चिकाटी या जोरावर त्यांनी बनवलेलं हे प्रॉडक्ट शेतकऱ्यांच्या फायद्याचं ठरत आहे. सरकारनं याकडं विशेष लक्ष देऊन सबसिडी जाहीर करावी, अशी मागणी जैनम चरखाचे संचालक अनिल जैन यांनी केली.

 

कर्करोग मुक्त भारत करणे हा मुलभूत संकल्प करून डॉ. ए.एस चन्नीवाला यांनी अनेक वर्षाच्या अथक संशोधनातून सेंद्रिय खताची निर्मिती केली आहे. शेतकऱ्यांनी रसायन मुक्त शेतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी ते कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. हे खत पिकास वापरल्या नंतर शेतकऱ्यांना युरिया, डि ए.पी पाण्यात विरघळणारे एन पी के,सुक्ष्म अन्नद्रव्ये,सल्फेट खते किंवा कोणतेही रासायनिक खत वापरण्याची गरज पडत नाही.

 

आपले पिक चांगल्या किमतीत विकायचे असेल किंवा रोगमुक्त राहायचे असेल तर हे खत योग्य आहे.मी चार एकर मध्ये हे खत वापरले आहे. फरक दिसून आला आहे.लवकरच गहू तयार होवून खाण्यासाठी वापर करणार असल्याचे सुभाष कागदे
(शेतकरी ,दसूर ता. माळशिरस) यांनी सांगितले.

 

You Might Also Like

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

TAGGED: #Scientist #lost #loved #ones #cancer #discovers #organic #fertilizer #Malshiras #Research #Alchemy, #कॅन्सर #माणसं #गमावलेल्या #शास्त्रज्ञ #शोधले #सेंद्रीयखत #माळशिरस #संशोधन #किमया
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Bhima Kesari सिंकदर शेख ठरला ‘भीमा केसरी’, मोहो॓ळमध्ये काढली मिरवणूक
Next Article पंढरीतून उद्यापासून शेतकरी संघटनेचे जनजागरण सप्ताह अभियान

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?