Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्रींना उत्तर प्रदेश सरकारने सीमेवर रोखले; तेथेच केले राऊतांनी धरणे आंदोलन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्रींना उत्तर प्रदेश सरकारने सीमेवर रोखले; तेथेच केले राऊतांनी धरणे आंदोलन

Surajya Digital
Last updated: 2020/08/20 at 9:27 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

आझमगड : उत्तर प्रदेशच्या आझमगड सीमेवर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांना रोखण्यात आले असून आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाल्यानंतर डॉ. राऊत हे उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर होते. याबाबतची माहिती डॉ. राऊत यांनी स्वत: ट्विट करत दिली आहे.

आझमगड सीमेवर डॉ. नितीन राऊत हे आल्यानंतर पोलिसांनी त्यांची गाडी अडवली. बांसा येथे आपल्याला जायचे आहे, असे राऊतांनी पोलिसांना सांगितले. पण कोणालाही बांसामध्ये जाण्याची परवानगी नसल्यामुळे तुम्हाला तिथे जाता येणार नाही, असे पोलिसांनी त्यांना सांगितल्यानंतर राऊत यांनी तिथेच धरणे आंदोलन केले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट, ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध

उत्तर प्रदेशच्या आझमगडमधील बांसा गावात स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला दलित सरपंचाची हत्या झाली होती. सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. नितीन राऊत पप्पू राम यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जात होते.

या प्रकरणाचे सत्य पडताळण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी यांनी एक सत्य-शोध समिती गावात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नितीन राऊत यांचा या समितीमध्ये समावेश आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रमुख अजय कुमार लल्लू आणि काँग्रेस खासदार पीएल पुनिया हे देखील नितीन राऊत यांच्यासोबत उपस्थित राहणार होते.

* यूपीतील सत्य-शोध समितीत राऊंताचा समावेश

अनुसूचित जाती-अनुसूचित जमातींवरील अत्याचारांचे अनेक गंभीर प्रकरणे समोर आली आहेत. डॉ राऊत यांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर देशभरात दलितांवरील अत्याचाराविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांचा विभाग पीडितांसाठी मदतीसाठी तत्परतेने काम करत आहे. तसेच त्यांना तात्काळ न्याय मिळेल यासाठीही काम करत असल्यामुळे महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री असलेले नितीन राऊत यांना उत्तर प्रदेशातील या प्रकरणाच्या सत्य-शोध समितीमध्ये सामील करण्यात आले आहे.

You Might Also Like

पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही

ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका

इंडोनेशिया : बतिक एअर कंपनीच्या विमानाचा अपघात थोडक्यात टळला

येत्या ५ तारखेला मोर्चाऐवजी विजयी मेळावा होणार – राज ठाकरे

अझहर महमूद पाकिस्तान क्रिकेट संघाचे नवे प्रशिक्षक

TAGGED: #ऊर्जामंत्री #आझमगढ #नितिनराऊत #सीमेवररोखले #धरणे #दलितसरपंच #हत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिद्धरामेश्वरांच्या जयघोषात लालपरी आजपासून धावली; वंचित बहुजन आघाडीकडून जल्लोष
Next Article राजीव गांधींचा मुलगा असल्याचा अभिमान; काँग्रेस नेत्यांसह उपराष्ट्रपतींनी वाहिली राजीवजींना श्रद्धांजली

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?