Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मंद्रूपच्या आंदोलक शेतकऱ्यांचा अखेर बैलगाडी मोर्चा मुंबईकडे रवाना
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsशिवारसोलापूर

मंद्रूपच्या आंदोलक शेतकऱ्यांचा अखेर बैलगाडी मोर्चा मुंबईकडे रवाना

Surajya Digital
Last updated: 2023/03/15 at 3:01 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

》 मंद्रूप – सोलापूर – मुंबई असा मार्ग असणार, रोज 25 कि.मी. प्रवास; सोळा दिवसांत गाठणार ‘वर्षा’

 

Contents
》 मंद्रूप – सोलापूर – मुंबई असा मार्ग असणार, रोज 25 कि.मी. प्रवास; सोळा दिवसांत गाठणार ‘वर्षा’स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

दक्षिण सोलापूर : मंद्रूप येथील नियोजित एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांच्या ७/१२ उता-यावर एमआयडीसीची नोंद केली आहे, ही नोंद रद्द व्हावी, यासाठी आंदोलक शेतकरी महादेव कुंभार व प्रवीण कुंभार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी मंद्रूपहून अखेर बैलगाडी मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे. The protesting farmers of Mandrup finally left the bullock cart march for Mumbai MIDC registered Satbara Solapur

 

या परिसरातील काही शेतकऱ्यांची जमीन देण्यास संमती नसतानाही ७/१२ उता-यावर एमआयडीसीची नोंद केली रद्द केली जात नाही. यासाठी ग्रामपंचायतीसमोर अनेक दिवस आंदोलन सुरू आहे, तरीही नोंद रद्द होत नसल्याने अखेर १४ मार्च रोजी शेतकरी मंद्रूप ते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय तिथून मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

 

यावेळी बोलताना कुंभार म्हणाले, काही अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आणि राजकीय नेत्यांच्या दबावामुळे काही संमती नसलेल्या शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर एमआयडीसीची नोंद झाली आहे. हे नोंद रद्द व्हावे यासाठी शेतकरी गेल्या चार वर्षापासून निवेदने दिली आहेत. अद्यापही उतारा-यावरील नोंद कमी झाले नाही, सध्या प्रकरण उच्च अधिकार समितीकडे प्रलंबित आहे, या समितीची बैठक जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत जमीन देण्यास विरोध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या उतारावरील एमआयडीसीची नोंद कमी व्हावी.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

सहा महिन्यापासून आंदोलन सुरू असल्यामुळे आमचे मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. उता-यावर एमआयडीसीची नोंद असल्याने आम्हाला पीककर्ज व इतर कर्ज बँकेकडून मिळत नाही त्यामुळे आंदोलक शेतकरी चिंतेत आहेत. हे आंदोलन शासनाने लवकर मिटवावेत, असेही
प्रवीण कुंभार यांनी म्हणाले.

मंद्रूपमधून निघाल्यानंतर दिवसाला २५ किलोमीटर अंतर कापण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी बैल थकतात, त्या ठिकाणी विसावा घेत पुन्हा पुढे कूच करण्यात येणार आहे. मुंबईला पोहोचण्यास किती दिवस लागतात माहीत नाही, तरीही १५ ते १६ दिवसांत पोहोचण्याचे नियोजन असल्याचे प्रवीण कुंभार यांनी सांगितले.

 

पाच बैलगाड्या अन् बैलांसाठी एक टेम्पो चारा अन् पाण्याचा टँकर घेतले आहे. खाण्या-पिण्याची,’ राहण्याची पर्वा न करता हे शेतकरी मंबईकडे निघाले आहेत. या बैलगाडी मोर्चामध्ये १२ महिला आहेत. सात-आठ लहान मुले आहेत. सुमारे ८० शेतकरी शेतकऱ्यांचा सहभाग आहे. विशेष म्हणजे महादेव कुंभार यांची नात आठ महिन्यांची तान्हुली अन्वी रविकांत कुंभार हिचा देखील त्यात समावेश आहे.

एमआयडीसीसाठी भूसंपादन केलेल्या सातबारा उताऱ्यावरील नोंद कमी करण्यासाठी मागील १७५ दिवसांपासून शेतकरी मंद्रूप ग्रामपंचायतीसमोर धरणे आंदोलन केले. मात्र, कोणीच दखल न घेतल्याने वैतागलेले शेतकरी आता मुंबईतील ‘मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी धडकणार आहेत. बैलगाडी मोर्चा घेऊन हे शेतकरी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.

 

मंगळवारी मंद्रूपहून निघालेले शेतकरी सोलापूरजवळील ए.जी. पाटील कॉलेजसमोरील मैदानावर विसावले आहेत. आज बुधवारी सकाळी पुन्हा मुंबईच्या दिशेने कूच केले. या बैलगाडी मोर्चात महादेव कुंभार, प्रवीण कुंभार, बाबू मेंडगुदले, मलकारी जोडमोठे, अनिल मेंडगुदले, गजानन शेंडगे, राम कुंभार, बाळू शेंडगे, राहुल कुंभार, बसवराज कुंभार, दयानंद म्हेत्रे, महादेव खांडेकर आदी शेतकरी उपस्थित होते.

 

 

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #protesting #farmers #Mandrup #finally #left #bullockcart #march #Mumbai #MIDC #registered #Satbara #Solapur, #सोलापूर #मंद्रूप #आंदोलक #शेतकरी #बैलगाडी #मोर्चा #मुंबई #रवाना #वर्षा #सातबारा #एमआयडीसी #नोंद
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कोरोनाने सोलापुरात एकाचा मृत्यू; रूग्णांची संख्या झाली 15
Next Article प्रेमविवाह केलेल्या तरुणाने घेतले पेटवून, झाला दुर्दैवी मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?