Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: देशाला वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षाने एकत्रित येण्याची गरज; माजी खासदार येचुरी यांचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

देशाला वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षाने एकत्रित येण्याची गरज; माजी खासदार येचुरी यांचे आवाहन

Surajya Digital
Last updated: 2023/06/01 at 10:23 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

■ भाजपवर केली सडकून टीका

सोलापूर : नव्या संसदेच्या इमारतीचे उद्घाटन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रजासत्ताक देशात प्रथमच राज्याभिषेक सोहळा पूर्ण करून घेतला आहे.  The need for secular parties to come together to save the country; Former MP Sitaram Yechury’s appeal criticized by BJP Sadkoon Solapur नव्या इमारती पेक्षा देशात सामाजिक सलोखा यावर भाष्य करणे अपेक्षित आहे. पण ते होताना दिसत नाही. अदानी यांना पोसण्यात मोदी सरकारचा वेळ चालला आहे. आगामी काळात देशाला आणि देशाच्या लोकशाहीला वाचवण्यासाठी धर्मनिरपेक्ष पक्षाने एकत्रित येण्याची गरज आहे. तसे प्रयत्न विरोधकांकडून केले जात आहेत, असे प्रतिपादन माकपचे माजी खासदार सिताराम येचुरी यांनी सोलापुरात केले.

सोलापूर दौऱ्यावर आले असता शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

येचुरी म्हणाले की, आज देशाची अवस्था खराब झाली आहे. सर्वत्र महागाई आणि बेरोजगारी वाढत आहे. याची सरकारला कोणती ही चिंता नाही. पैलवानांवर अत्याचार होत आहेत, मणिपूरमध्ये हिंसाचार वाढत आहेत. मात्र सरकार पार्लमेंटचे उद्घाटन करण्यात व्यस्त आहे. वास्तविक पाहता संसद भवनची इमारत नवीन नाही तर मजबूत असणे आवश्यक आहॆ. नवीन संसद भवनाचे उद्घाटन करताना कोणालाही विश्वासात घेतले नाही, कोणतेही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. हे उद्घाटन म्हणजे मोदी यांचा राज्याभिषेकच होता.

 

2022 मध्ये संसदेत केवळ 56 दिवस कामकाज चाचले चालले तर मनमोहन सिंग यांच्या काळात 200 पेक्षा जास्त दिवस संसदेचे कामकाज चालू होते. यावरून भाजपला लोकांची किती चिंता आहे हे कळून येते. आज संसदेत 50 लाख कोटींचे बजेट केवळ पाच मिनिटात मंजूर करण्यात येते. हे दुर्दैव आहे. भाजपाकडून संविधान पायदळी तुडवले जात आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

आगामी काळात लोकशाही वाचवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. राज्यात ज्यांची ताकद आहे तेथे त्या पक्षांनी पुढाकार घेतला पाहिजे. लवकरच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यापुढेही अशा अनेक बैठका होणार आहेत. संविधान वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी आज एकत्र येणे गरजेचेच असल्याचे माजी खासदार येचुरी म्हणाले.

 

• चौकशी मागे लावून विरोधकांना गप्प करण्याचे प्रयत्न

केंद्र सरकारकडून सहकारी संस्थांचा गैरवापर होत आहे. अनेक नेत्यांच्या मागे ईडी, सीबीआय चौकशी लावून त्यांना गप्प करण्याचे प्रयत्न होत आहेत. सहकारी संस्थांचा असा वापर यापूर्वी कोणत्याही सरकारच्या काळात झाला नव्हता. जे नेते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या मागच्या चौकशी बंद करण्यात आल्या आहेत, असेही येचुरी म्हणाले.

 

• समोरची आव्हाने काय आहेत हे पाहून मतदान करा

देशभरामध्ये जातीपातीचे राजकारण करून सांप्रदायिक आणि ध्रुवीकरणाच्या नावाखाली हिंदू व्होट बँक मजबूत करण्याचा डाव आखला जात आहॆ. आज भाजप विरहीत व्होट बँक तयार करण्याची गरज आहॆ. मोदींचा चेहरा बघून लोक मतदान करत आहेत, हे अत्यंत चुकीचे आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या समोरची नेमकी कोणती आव्हाने आहेत हे पाहून जनतेने विचार केला पाहिजे, असेही येचुरी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

TAGGED: #need #secular #parties #come #together #save #country #Former #MP #SitaramYechury #appeal #criticized #BJP #Sadkoon #Solapur, #देश #वाचवण्यासाठी #धर्मनिरपेक्ष #पक्ष #एकत्रित #गरज #माजीखासदार #सितारामयेचुरी #आवाहन #भाजप #सडकून #टीका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आषाढी वारीसाठी टोल माफ, रस्त्यांची दुरूस्ती, दुप्पट निधीची केली तरतूद
Next Article अहो, मास्तर जरा महेशकडे लक्ष द्या : जयंत पाटील

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?