Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मुंबईपाठोपाठ सांगलीचा मृत्यूदर सर्वाधिक; 24 दिवसात 267 कोरोनाबळी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

मुंबईपाठोपाठ सांगलीचा मृत्यूदर सर्वाधिक; 24 दिवसात 267 कोरोनाबळी

Surajya Digital
Last updated: 2020/08/26 at 2:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सांगली : मुंबई शहरातील मृत्यूदर 5.42 इतका आहे. त्यापाठोपाठ सर्वाधिक मृत्यूदर सांगली जिल्ह्याचा आहे. 24 दिवसात 267 जणांचा मृत्यू झाला असून मृत्यूदर 3.96 टक्‍क्‍यांवर पोहचला आहे. ही बाब चिंता वाढवणारी आहे. दुसऱ्या बाजूला एकूण रुग्णसंख्येतील बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून 61.12 टक्‍क्‍यांवर गेले आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत गेल्या 24 दिवसात झपाट्याने वाढ झाली आहे. 31 जुलै रोजी एकूण रुग्णसंख्या 2 हजार 643 इतकी होती. त्यावेळी त्यातील 78 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यावेळी मृत्यूदर 3.47 टक्के होता. गेल्या 24 दिवसांत 6 हजार 51 रुग्णांची संख्या वाढली असून मृत्यूची संख्या 345 वर पोहचली आहे. सध्याचा मृत्यूदर चिंता वाढवणारा ठरत आहे.

मृत्यूमध्ये वृद्धांचे प्रमाण सर्वाधिक दिसून येत आहे. चाळीसच्या आतील तरुणांचे मृत्यूही झाल्याचे दिसून येत आहे. काल मंगळवारी दिवसभरात उच्चांकी 25 जणांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील रुग्णांची संख्या अधिक दिसून आली. सद्यस्थितीत चारशेहून अधिक जणांची प्रकृती चिंताजनक असून त्यातील 75 जण व्हेंन्टिलेटरवर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 353 जण ऑक्‍सिजनवर आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज

मुंबईपाठोपाठ सांगली जिल्ह्यात मृत्यूदर अधिक आहे. गेल्या 24 दिवसांत रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या दिवसागणीक वाढत असून रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहे. उपचारासाठी रुग्णालयात जाग मिळत नाही. त्यामुळे उपचाराविना रुग्णांचे हाल सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी एका रुग्णालयाबाहेर वेळेत उपचार न मिळाल्यामुळे तरूणाचा जीव गेला. प्रशासनाने पर्यायी व्यवस्था उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.

* असा आहे मृत्यूदर

मुंबई शहरात 1 लाख 37 हजार 96 इतकी रुग्णसंख्या असून त्यापैकी 7 हजार 442 रुग्णांचा मृत्यू झाला. हा मृत्यूदर 5.42 इतका आहे. ठाणे विभागात मुंबई, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरभाईंदर पालघर, वसई विरार, रायगड, पनवेल हे भाग येतात. या साऱ्याची रुग्णसंख्या 3 लाख 11 हजार 66 इतकी आहे. त्यापैकी 12 हजार 279 जणांचा मृत्यू झाला. त्याची टक्केवारी 3.94 इतकी आहे. नाशिक विभागात 80 हजार 879 रुग्णसंख्या असून मृत्यू 2008 आहेत. त्याची टक्केवारी 2.48 आहे.

पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या 1 लाख 52 हजार 511 इतकी असून त्यापैकी 3 हजार 765 जणांचा मृत्यू झाला. त्यांचा मृत्यू दर 2.46 टक्के इतका आहे. कोल्हापूर विभागात सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा मृत्यूदर 2.65 टक्के इतका आहे.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #मृत्यूदर #सांगली #मुंबई #ठाणे #पुणे
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article यावर्षी दोन हजाराची एकही नोट छापली नाही; नोट बंद होणार का ?
Next Article छोट्या पडद्यावरील अभिनेत्री संगीता श्रीवास्तव यांचे निधन

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?