Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वि.प. पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांची नाव जाहीर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

वि.प. पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या तीन उमेदवारांची नाव जाहीर

admin
Last updated: 2025/03/16 at 12:12 PM
admin
Share
2 Min Read
Oplus_131072
SHARE

मुंबई, १६ मार्च (हिं.स.) : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक घोषित केली आहे. यात भाजप सर्वाधिक तीन जागा लढवणार आहे. त्यासाठी भाजपच्या केंद्रीय कार्यालयाकडून आज संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे या तीन उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहेत.

विधान परिषदेत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रत्येकी एक जागा लढवणार आहेत. उद्या, सोमवारी अर्ज दाखल करायचा आहे. संदीप जोशी हे नागपूरमधून येतात. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. संजय केनेकर हे छत्रपती संभाजीनगरमधून येतात. त्यांनी पक्षाचे महामंत्री म्हणून उत्तम काम केलेलं आहे. दादाराव केचे यांना विधानसभेच्या वेळी तिकीट नाकारण्यात आलं होतं. म्हणून त्यांची आता विधान परिषदेवर वर्णी लागली आहे.

विधान परिषदेतील भाजपचे प्रवीण दटके, रमेश कराड, गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजेश विटेकर या पाच सदस्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाल्याने त्यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. प्रवीण दटके हे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघ, रमेश कराड हे लातूर ग्रामीण, गोपीचंद पडळकर हे जत मतदारसंघ, आमश्या पाडवी हे अक्कलकुवा, तर राजेश विटेकर पाथरी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

आता पोटनिवडणूक होणार असल्याने नव्याने नियुक्ती होणाऱ्या पाच उमेदवारांचा कार्यकाळ हा वरील पाच जणांच्या विधानपरिषदेतील कार्यकाळ ज्या दिवशी संपणार होता त्या दिवसापर्यंतच असणार आहे.

पोटनिवडणुकीचा कार्यक्रम

सोमवार, 17 मार्चपर्यंत नामांकन अर्ज दाखल करणे.

दाखल केलेल्या नामांकन अर्जांची छाननी मंगळवार, 18 मार्च रोजी केली जाईल.

नामांकन अर्ज मागे घेण्याची मुदत गुरूवार, 20 मार्च

गुरूवार, 27 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होईल. त्यानंतर मतमोजणी करण्यात येईल.

ही संपूर्ण प्रक्रिया 29 मार्चपर्यंत पूर्ण होईल.

You Might Also Like

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार

राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग

शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना – गोपीचंद पडळकर

राज ठाकरेंची अमित शाह-जय शाह यांच्यावर व्यंगचित्रातून टीका

अजितदादांना थेट पर्रिकर यांच्याप्रमाणे काम करण्याचा पुणेकर महिलेचा सल्ला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article प्रसिद्ध गायक ए आर रहमान हॉस्पिटलमध्ये दाखल
Next Article Lashkar-e-Taiba's most wanted terrorist Abu Qatal killed in Pakistan लश्कर-ए-तैयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कतालची पाकिस्तानात हत्या

Latest News

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
राजकारण September 18, 2025
निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
देश - विदेश September 18, 2025
सोलापूर – आयटी पार्कसाठी चार जागांचा प्रस्ताव; काम अंतिम टप्प्यात
सोलापूर September 18, 2025
इगतपुरीत अवैध कॉलसेंटरवर छापा, दोघांना अटक, २४ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र September 18, 2025
मतदान चोरी एका संघटित कटाचा भाग; केवळ काँग्रेस समर्थक मतदार लक्ष्य – राहुल गांधी
महाराष्ट्र September 18, 2025
तालिबानची अफगाणिस्तानात इंटरनेट आणि फायबर-ऑप्टिक सेवेवर बंदी
देश - विदेश September 18, 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची गट-क अराजपत्रित सेवा मुख्य परीक्षा रविवारी
महाराष्ट्र September 18, 2025
राहुल गांधींचे आरोप चुकीचे आणि निराधार – निवडणूक आयोग
राजकारण September 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?