प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, शहाजी पाटील उमेश पाटील नाराज क्यों हो गए भाई? और है ना बडा मोका ! विधान परिषदेच्या अजून 35 आमदारांच्या निवडीचं धूमशान!!
– हिरमोड झालेल्यांचे चमकू शकतात पुन्हा स्टार
– आमदारकीचे सिंहासन मिळविताना लॉबिंगसाठी पुरेसा वेळ
– पुनर्रवसनाच्या ट्रॅकवरील चेहर्यांना अजून एक गोल्डन चान्स
– प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, शहाजी पाटील
उमेश पाटील एमएलसीला मैदान मारण्याची संधी
खास प्रतिनिधी
सोलापूर : पाच जागांसाठी जाहीर झालेली विधान परिषदेची पोटनिवडणूक बिनविरोध झाल्याने राज्याला नवीन 5 आमदार मिळाले आहेत. भाजपकडून दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी, राष्ट्रवादीकडून संजय खोडके आणि शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी अशी या नव्या आमदारांची नावे आहेत. दरम्यान, विधान परिषदेसाठी संधी न मिळालेल्या नाराजांचे काय? हा मुद्दा उपस्थित झाला आहे. पुनर्रवसनाच्या ट्रॅकवरील चेहर्यांना अजून एक गोल्डन चान्स मिळणार आहे. येत्या काळात 21 आणि पुढील वर्षी 14 अशा एकूण तब्बल 35 जणांना मागच्या दाराने म्हणजेच विधान परिषदेच्या माध्यमातून विधानसभेत जाता येणार आहे. आमदारकीचे त्यांचे स्वप्न साकार होणार आहे. त्यामुळे पाच जागेवर संधी मिळाली नाही तरी हकरत नाही, भविष्यात ती मिळू शकते, या शब्दात नाराज झालेल्या काहींची समजूत काढली जात असल्याची माहिती दैनिक ‘सुराज्य’ मिळाली आहे.
विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते, राजेंद्र राऊत, शहाजी पाटील तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांना विधान परिषदेच्या आमदारकीचे मैदान मारण्याची पुन्हा संधी लाभू शकते. उल्लेखनीय बाब म्हणजे विधानपरिषेदच्या आमदारकीचे सिंहासन मिळविण्यासाठी आपल्या गॉडफदारांकडे लॉबिंग करण्याचा पुरेसा वेळ या संबंधित इच्छुकांना मिळणार आहे. मंगळवार (ता.18) विधान परिषदेवर 5 आमदारांची निवड झाली, त्यामध्ये संधी न मिळालेल्या आणि हिरमोड झालेल्यांचे आमदारकीच्यादृष्टीने पुन्हा स्टार चमकू शकतात,
हे खासच.विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजप, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेना या तिन्ही पक्षातील ज्यांच्या नावांची चर्चा होती, त्यांना संधी न मिळाल्याने हे इच्छुक नाराज झाले आहेत. ही यादी मोठी आहे. पण या इच्छुकांनी आता खचून न जाता पुन्हा तयारीला लागण्याचा मोका आहे. कारण अजूनही विधान परिषदेच्या तब्बल 21 जागा रिक्त आहेत. या जागांवर डोळा ठेवून सगळेच आपआपल्या परिने 21 आमदारांमध्ये आपला समावेश कसा होईल, यासाठी मोठी धडपड करु शकतात.
21 जागेच्या संधीचे ‘असं’ आहे गणित
महाराष्ट्र विधानपरिषदेची 78 सदससंख्या आहे. यातील 30 सदस्य विधानसभा सदस्य निवडून देतात. 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येतात. तर 7 सदस्य पदवीधर मतदारसंघांमधून आणि 7 सदस्य शिक्षक मतदारसंघांमधून निवडून येतात. याशिवाय कला, क्रीडा, साहित्य, समाजसेवा अशा क्षेत्रातील विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या 12 व्यक्तींची राज्यपालांद्वारे नियुक्ती केली जाते. काही दिवसांपूर्वी राज्यपाल नियुक्त 12 पैकी 6 सदस्यांची नियुक्ती झाली आहे. तर अद्याप 6 जागा रिक्त आहेत. याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे 22 पैकी निवृत्त झालेल्या तब्बल 15 सदस्यांच्या जागेवरही निवडणूक झालेली नाही. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 6 आणि स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून येणार्या 15 अशा 21 जागा आज घडीला रिक्त आहेत. या 21 जागेवर इच्छुक चेहर्यांना हमखास संधी मिळू शकते.
पुढच्या वर्षी 14 जागांचा धमाका
विधान परिषदेच्या 21 जागेच्या निवडीसाठी धूमाशान होताना. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातील आमदार अंबादास दानवे यांची मुदत येत्या 29 ऑगस्ट रोजी संपत आहे. तर विधानसभा सदस्यांमधून निवडून येणार्या 9 आमदारांची, शिक्षक मतदारसंघातील 2 आणि पदवीधर मतदारसंघातील 3 अशा 14 जणांच्या आमदारकीची मुदत पुढील वर्षाअखेरीपर्यंत संपत आहे.या 14 जागांच्या निवडीसाठी पुढच्या वर्षी धमाका होणार आहे.
प्रमुख पक्षातील इच्छुक चेहर्यांसाठी ‘गोल्डन चान्स’
अलिकडच्या काळात 21 आणि पुढील वर्षी 14 अशा एकूण 35 जागेवर राज्यातून इच्छुक चेहर्यांना जाण्याची मोठी संधी आहे. या पार्श्वभूमीवर, इच्छुकांकडून मोठे लॉबिंग होण्याची होणार आहे. आता या जागांवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार किंवा अन्य इच्छुकांमध्ये कोणाकोणाला संधी मिळणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.