Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता भिंतीचे भूमिपूजन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता भिंतीचे भूमिपूजन

admin
Last updated: 2025/03/26 at 12:47 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

मुंबई, 26 मार्च (हिं.स.)।

राज्यपाल सी पी राधाकृष्णन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी देशातील स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ कृतज्ञता भिंतीच्या निर्मितीसाठी भूमिपूजन करण्यात आले.

चक्र व्हिजन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या पुढाकाराने या कृतज्ञता भिंतीची (Tribute Wall: The Wall of Honour for Freedom Fighters) निर्मिती केली जात आहे.

भूमिपूजन सोहळ्याला विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पुडुचेरी विधानसभेचे अध्यक्ष एम्बलम आर सेल्वम, राज्याचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार श्रीकांत भारतीय, चक्र व्हिजन इंडिया फाउंडेशन ट्रस्टचे संस्थापक चक्र राजशेखर, उपाध्यक्ष गगन महोत्रा आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चक्र व्हिजन ट्रस्टचे संस्थापक चक्र राजशेखर यांनी कृतज्ञता भिंत निर्मितीची संकल्पना स्पष्ट केली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी विविध राज्यांमधील स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिले आहे. परंतु इतर राज्यांमधील स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाची लोकांना कल्पना नसते. ७० फूट लांब व दहा फूट रुंद अश्या प्रस्तावित भिंतीवर देशभरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे कोरलेली असतील असे त्यांनी सांगितले. या ठिकाणी क्यूआर कोड असेल ज्यामुळे प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांची माहिती मिळू शकेल असे त्यांनी सांगितले.

तामिळनाडू व महाराष्ट्राचे संबंध पूर्वापार अतिशय घनिष्ट असून छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील तामिळनाडूला भेट दिली होती व तंजावूर येथील सरस्वती ग्रंथालय आजही उभे असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण देशभरात अश्याप्रकारे १०८ भिंतींची निर्मिती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

—————

You Might Also Like

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

उजनी धरणातून ३ महिन्यात सोडले २०० टीएमसी पाणी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सुराज्य ब्रेकिंग..’येथे’ पिकअप आणि सफारीचा अपघात, ‘देव तारी त्याला कोण मारीचा’ चा प्रत्यय
Next Article ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’ कार्यक्रमाच्या ट्रॉफीचं अनावरण

Latest News

पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा संघर्ष : लष्करी चौक्या आणि टँक उद्ध्वस्त
देश - विदेश October 15, 2025
नक्षलवादी वरिष्ठ कमांडरसह ६० सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 15, 2025
सोनम वांगचुक प्रकरण : २९ ऑक्टोबरला पुढील सुनावणी
देश - विदेश October 15, 2025
अमेरिकेतील भारतीय वंशाचे प्रमुख राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ एशले टेलिसला अटक
देश - विदेश October 15, 2025
श्री सिद्धेश्वर देवस्थानतर्फे अतिवृष्टीग्रस्तांसाठी 25 लाखाचा निधी
महाराष्ट्र October 15, 2025
बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?