सोलापूर-विशेष प्रतिनिधी
मायलेकीच्या आत्महत्येने तुळजापूर शहर हादरले आहे. तुळजापूर शहरातील गवते प्लॉटिंग येथे राहणार्या रत्नमाला संजय पवार, वय 45, रा करंजे ता. करमाळा हल्ली मुक्काम तुळजापूर आणि त्यांची नवविवाहित मुलगी प्रतीक्षा तुषार पाटील, वय 23 रा. सापटणे ता. टेभुर्णी असे आत्महत्या केलेल्या माय – लेकींची नावे आहेत. या दोघींनी राहत्या घरामध्ये आतून कडी लावून गळफास घेतला.प्रतिक्षाचा विवाह सहा महिन्यांपूर्वी एका शेतकरी मुलाशी लावून दिल्याबद्दल ती अस्वस्थ होती.त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
अनेक मुली सध्या आपला होणारा नवरा नोकरदार असावा, अधिकारी असावा, अशी अपेक्षा ठेवतात. नोकरदार, अधिकारी या मुलांना अनेकदा नवरा म्हणून मुलींची पसंती मिळते. तर दुसरीकडे शेतकरी मुलगा नवरा म्हणून नको असल्याचे म्हणत शेतकरी मुलांना नकार मिळत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. परंतु एखाद्या शेतकरी मुलाच्या घरची परिस्थिती चांगली असेल, तर आपली मुलगी सुखी आणि आनंदी राहील, या हेतूनेच मुलीचे आई – वडील मुलीच्या सुखासाठी मुलीचे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध लावून देतात अशा घटना समोर आहेत. असाच एक प्रकार समोर आला असून यातून भयंकर, धक्कादायक पाऊल मुलीने उचलल्याची घटना घडली
नेमकं काय घडले?
असाच एक प्रकार तुळजापूर शहरात घडला आहे. आपल्या मनाविरुद्ध शेतकरी मुलासोबत लग्न लावून दिल्याने नवविवाहित तरुणीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 6 महिन्यांपूर्वी मुलीचे एका शेतकरी मुलाशी लग्न लावून देण्यात आले होते. पण 23 वर्षीय नव-विवाहितेने आपल्या आईसह नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन घरात आत्महत्या केली. आपल्या इच्छे विरुद्ध शेतकरी मुलासोबत लग्न लावण्यात आले, ही गोष्ट असह्य झाल्यामुळे तरुणीने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती आहे.
ही घटना समजताच पोलीस निरिक्षक आण्णासाहेब मांजरे, पोलीस उपनिरिक्षक विजय थोटे, तपास अंमलदार शिखारे हे घटनास्थळी हजर झाले.सदर घटनेबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आले नाही. मात्र्ा केवळ शेतकरी मुलाबरोबर लग्न लावलं म्हणून टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा सर्वत्र्ा आहे. मात्र्ा मूळ कारण अजूनही अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.