Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रमजान ईद हा बंधूभाव व मानवतेचा संदेश – बाळासाहेब थोरात
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

रमजान ईद हा बंधूभाव व मानवतेचा संदेश – बाळासाहेब थोरात

admin
Last updated: 2025/03/31 at 5:17 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अहिल्यानगर दि. 31 मार्च ( हिं. स.) : भारतामध्ये विविध धर्म – पंथ – जात असूनही मानवता धर्म व भारतीयत्व हे सर्वांना जोडणारे आहे. रमजान ईद हा पवित्र सण एक महिन्याच्या उपवासानंतर येतो. जगामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या आनंदाने आणि पवित्र भावनेने हा सण साजरा करतात. यामध्ये देशातील सर्व धर्मीय सहभागी होतात. एकता ही भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असून रमजान ईद हा बंधुभाव व मानवधर्माचा संदेश देणारा सण असल्याचे प्रतिपादन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

संगमनेर मधील ईदगाह मैदान येथे रमजान ईद निमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. यावेळी समवेत माजी आ.डॉ.सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री थोरात, विश्वासराव मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, गणेश मादास,किशोर कालडा आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शुभेच्छा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी उपवास हा परमेश्वराच्या जवळ जाण्या चा मार्ग असल्याचे सांगितले आहे. उपवासाने जीवनातील पवित्रता वाढते. रमजान महिना हा आनंददायी व प्रेरणा देणारा आहे. भारतीय संस्कृतीमध्ये विविधता असून सर्व धर्म समभावामुळे सर्व नागरिक एकमेकांचे सण आनंदाने साजरे करतात. आपल्या देशाची ताकद आहे. रमजान ईद हा सन संपूर्ण जगामध्ये मोठ्या आनंदाने व उत्साहाने मुस्लिम बांधव साजरा करत असून बंधू भावाचा प्रेमाचा आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण आहे.सर्वधर्मसम भाव व मानवताधर्म वाढल्याने देशाची खरी ताकद वाढणार असून प्रगती होणार असल्याचे ते म्हणाले.माजी आ.डॉ.तांबे म्हणाले की, रमजान ईद हा सन जगासह भारतात मोठ्या आनंदाने साजरा करतात. यानिमित्त महिनाभर उपवास केले जातात. ईश्वराजवळ राहण्याचा उपवास हा मार्ग असून अंतकरणाच्या शुद्धीसाठी पवित्र उपवास केले जातात.रम जान ईद निमित्ताने सर्व बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

डॉ.जयश्री थोरात म्हणाल्या की, भारतामध्ये अनेक धर्म पंथ आहे.सांस्कृतिक विविधता ही देशाची परंपरा आहे. जात ,धर्म,पंथ वेगळे असले तरी भारतीय म्हणून सर्वजण एकत्र येऊन सण साजरे करत असतात. आणि हीच खरी देशाची ताकद असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी संगमनेर शहरातील मुस्लिम बांधव, इतर सर्व धर्मीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article संतांचे विचार आजच्या पिढीकरीता एक आदर्श – हभप गुलाब महाराज खालकर
Next Article बीड मशिद स्फोट प्रकरण : आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?