Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: राज्यातील पुढील ५ दिवस अवकाळी पावसाची शक्यता
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

राज्यातील पुढील ५ दिवस अवकाळी पावसाची शक्यता

admin
Last updated: 2025/04/01 at 12:32 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 1 एप्रिल (हिं.स.)।राज्यातील काही भागांत दोन दिवसांपासून मध्यम ते हलक्या स्वरूपातील अवकाळी पावसामुळे उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.पुढील पाच दिवस असेच हवामान राहणार आहे. याशिवाय हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हिमालय ते उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात सक्रिय झाला आहे. तामिळनाडू राज्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील बहुतांश भागात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज(दि. १) आणि उद्या(दि. २)पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला 1 ते 3 तारखेपर्यंत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत बुधवार(दि. २)पाऊस होईल असा अंदाज आहे. या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट मिळाला आहे.जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, पुण्यातील घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस यलो अलर्ट तर सातारा जिल्ह्यात उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यासाठी 3 आणि 4 एप्रिल, नांदेडसाठी 4 एप्रिल, लातूर, धाराशिव जिल्ह्यांसाठी 3 व 4 एप्रिल, अकोला आणि अमरावतीत पुढील दोन दिवस, भंडारा जिल्ह्यात 2 ते 4 एप्रिलपर्यंत, बुलढाणा आज आणि उद्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या सर्वच ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील हवामान अस्थिर राहणार आहे. हवामान विभागाच्या सततच्या निरीक्षणानुसार परिस्थिती बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य ती खबरदारी घ्यावी.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उद्यापासून ऐरोलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञानस्मारकात विचारांचा ‘जागर’
Next Article फ्रान्समधील उजव्या विचारांच्या नेत्या मरीन ली-पेन यांच्यावर 5 वर्षांची बंदी

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?