Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अमरावती : नितीन देशमुखांची एकनाथ शिंदेवर जहाल टीका
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

अमरावती : नितीन देशमुखांची एकनाथ शिंदेवर जहाल टीका

admin
Last updated: 2025/04/16 at 6:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अमरावती, 16 एप्रिल (हिं.स.) : अमरावतीमध्ये शिवसेना (उबाठा) च्या विभागीय निर्धार मेळाव्यात खासदार अरविंद सावंत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. सावंत यांनी मोदी सरकारच्या अपयशांची यादी मांडली. १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन, कर्जमाफी, महागाई नियंत्रण आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सरकार अपयशी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

मेळाव्यात आमदार नितीन बापू देशमुख यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना भगव्याच्या आत दडलेले सैतान असे संबोधले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.कार्यक्रमाला वाशिम-यवतमाळचे खासदार संजय देशमुख, आमदार गजानन लवटे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार संजय दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

माजी मंत्री अशोक शिंदे, माजी खासदार अनंत गुढे, उपनेते सुधीर सूर्यवंशी आणि तीन जिल्ह्यांचे प्रमुख देखील उपस्थित होते.सावंत यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची टीका केली. सरकार राज्यांमधील सत्तापालट करण्यात अधिक रस घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अयोध्येतील निवडणुकीत भाजपला अपयश आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. मेळाव्याचे संचालन जिल्हाप्रमुख पराग गुडधे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चा

विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कृती करणार आहे. पक्षाने 2 मे रोजी विदर्भातील सहा जिल्ह्यांमध्ये ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन केले आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी अमरावतीत झालेल्या विभागीय निर्धार मेळाव्यात या मोर्चाची घोषणा केली. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हा मोर्चा निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. पक्षाने 5 हजार गावांमध्ये निर्धार सभा घेण्याचे नियोजन केले आहे. या मोर्चात सुमारे 5 लाख शेतकरी सहभागी होतील असा अंदाज आहे.

You Might Also Like

भाजपने राऊत यांच्यावर केली तीव्र टीका; सैन्याच्या अपमानासाठी माफी मागण्याची मागणी

गोवा विधानसभा अध्यक्षांनी दिला राजीनामा, मंत्रीपदाची शपथ घेतली

“मूलभूत समस्यांवर तोडगा नाही तर कठीण” – राज ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राज ठाकरे-फडणवीस भेटीवर उदय सामंत म्हणाले- “टायमिंग साधण्यात माहिर”

राज ठाकरे-फडणवीस भेटीमुळे महाराष्ट्र राजकारणात चर्चा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आंदोलनातून काँग्रेस कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे – मोहन जोशी
Next Article डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि आरएसएस

Latest News

कोल्हापूर: कळंबा जेल परिसरातील घरात पाईपलाईनच्या गॅसचा स्फोट; चौघे जखमी
देश - विदेश August 26, 2025
सुप्रीम कोर्टाकडून ‘वनतारा’ प्रकरणी एसआयटी चौकशीचे आदेश; माजी न्यायाधीशांची समिती
देश - विदेश August 26, 2025
इम्रान खान यांच्या पक्षाच्या ७५ नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना न्यायालयाने सुनावली शिक्षा
देश - विदेश August 26, 2025
अमेरिकेत एच-१बी व्हिसा बंद होण्याची शक्यता; रिपब्लिकन सिनेटरचे विधान
Top News देश - विदेश August 26, 2025
aurangabad-gopinath-munde-farmer-accident-insurance-scheme-beneficiaries
गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप
महाराष्ट्र August 26, 2025
पित्याने केली मुलीची आणि तिच्या प्रियकराची हत्या
Top News August 26, 2025
मरीन ड्राईव्ह येथे तरुणीचा मृतदेह सापडला; तपास सुरू
महाराष्ट्र August 25, 2025
अकोल्यामध्ये रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शिवसंग्रामचे रास्ता रोको आंदोलन
महाराष्ट्र August 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?