Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार – चंद्रकांत पाटील

admin
Last updated: 2025/04/22 at 6:05 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सांगली, 22 एप्रिल (हिं.स.)।

जलजीवन मिशनसारख्या योजनेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील महिलांची पाण्यासाठी भटकंती थांबली आहे. गावच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

जलजीवन मिशन अंतर्गत बिसूर गावच्या ४.७५ कोटी रुपये रकमेच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व ४ कोटी रुपये रकमेच्या बिसूर- कर्नाळ रस्त्याच्या कामाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार, पृथ्वीराज पवार, बिसूर गावचे सरपंच सतिश निळकंठ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पूर्वी एखादा चित्रकार ग्रामीण भागातील महिलांचे चित्र रेखाटताना; तिच्या डोक्यावर पाण्याचा हंडा आणि आसपास कोठेही पाण्याची व्यवस्था नसल्याने तिची वणवण दाखवायचा. मात्र जलजीवन मिशनमुळे आज ग्रामीण भागातील महिलांची पाण्यासाठी वणवण थांबल्याने, महिलांचे श्रम संपले आहेत, अन् महिलांच्या चेहऱ्यावर समाधान असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले की, शहरातील अत्याधुनिक सोयीसुविधांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा शहराकडे जाण्याचा ओढा वाढलेला आहे. मात्र गावातही अशा सुविधा निर्माण केल्यास, शहराकडे जाण्याचा ओघ कमी होईल. त्यामुळे ग्रामपंचायतीने त्या अनुषंगाने प्रयत्न केल्यास, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, बिसूर गावासाठी पाणीपुरवठा योजना अतिशय महत्त्वाची होती. त्याचं भूमिपूजन आज होतंय, त्यामुळे याचा अतिशय आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी सरपंच सतिश निळकंठ यांनी मनोगत व्यक्त केले.

बिसूरची वाढती लोकसंख्या आणि विस्तार यांचा विचार करून जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यावर बिसूर हे गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. त्यामुळे थकबाकीमुळे वीज खंडित होऊन गावचा पाणीपुरवठा खंडित होणार नाही.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article JSW एनर्जी तर्फे अल्ट्रा सुपरक्रिटिकल थर्मल पॉवर प्लांटचे भूमिपूजन
Next Article क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?