Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात दीनदयाल उपाध्याय अध्यासन स्थापन करणार – राज्यपाल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात दीनदयाल उपाध्याय अध्यासन स्थापन करणार – राज्यपाल

admin
Last updated: 2025/04/26 at 5:11 PM
admin
Share
2 Min Read
??????????????
SHARE

मुंबई, 26 एप्रिल (हिं.स.)

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी त्या काळात प्रचलित असलेला साम्यवाद व भांडवलशाही यांच्या सुवर्णमध्य साधत एकात्म मानवतावादाचा सिद्धांत मांडला होता. दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर स्वामी विवेकानंद व महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. दीनदयाल उपाध्याय यांचे विचार विद्यार्थी व युवकांमध्ये पोहोचवल्यास ते देशभक्त नागरिक होतील व विकसित भारताचे लक्ष्य वास्तवात येईल असे सांगून रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात दीनदयाल उपाध्याय अध्यासन स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी मुंबई येथे केली.

पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मुंबईतील रुईया महाविद्यालयात दिनांक २२ ते २५ एप्रिल १९६५ येथे एकात्म मानवतावाद या विषयावर व्याख्याने दिली होती. त्या व्याख्यानमालेच्या हिरक महोत्सवानिमित्त रुईया महाविद्यालय येथे आयोजित चर्चासत्राला संबोधित करताना राज्यपाल बोलत होते.

चर्चासत्राचे आयोजन दीनदयाल शोध संस्थान व लोढा फाउंडेशन यांनी केले होते.

साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेल्या उपाध्याय यांच्या विचारांना प्रत्यक्षात आणण्याचे कार्य दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी व सध्याच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत असे सांगून ग्रामीण भागात रस्ते, गरिबांना स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन, पेयजल या योजना त्याचाच परिपाक असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

करोना काळात पाश्चात्य देशांनी लस शोधली असती तर तिची किंमत जनतेच्या आवाक्यात राहिली नसती असे सांगून भारताने संपूर्ण देशवासियांना मोफत लसी दिली व त्याहीपलीकडे जाऊन अनेक देशांना मोफत करोना प्रतिबंधक लस मोफत दिली हा समावेशक विचार पंतप्रधान मोदी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्याकडूनच अंगिकारला आहे, असे राज्यपालांनी सांगितले.

देशात अनेक लोकांना दोन वेळचे जेवण मिळत नाही या वास्तवाचे भान ठेवून अन्न वाया जाऊ देऊ नये. तसेच प्रत्येकाने धन अर्जन करावे परंतु अनावश्यक खर्च करू नये व केवळ स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगावे हा दीनदयाल उपाध्याय यांचा विचार स्वीकारला पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल, कौशल्य व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत सुरेश सोनी, दीनदयाल शोध संस्थांचे सरचिटणीस अतुल जैन, विविध विद्यापीठांचे कुलगुरु आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पोप फ्रान्सिस यांची समाजसेवा जगाच्या कायम स्मरणात राहील : पंतप्रधान
Next Article प. बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान – आशीष शेलार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?