Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विशाखापट्टणम : नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

विशाखापट्टणम : नरसिंह स्वामी मंदिराची भिंत कोसळून ८ जणांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/04/30 at 7:01 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

– पंतप्रधानांकडून मदत जाहीर

विशाखापट्टणम, 30 एप्रिल (हिं.स.)। आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्री वराह लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिर सिंहाचलम येथे मंगळवारी (दि.२९)रात्री भीषण अपघात झाला आहे.श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिराच्या भिंतीचा २० फूट लांबीचा भाग कोसळल्याने हा अपघात घडला.या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील श्री वराह लक्ष्मी नृसिंह स्वामी मंदिरात चंदनोत्सव चालू होता.यासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी जमा झाली होती, त्यावेळी अचानक 20 फूट उंचीची एक भिंत कोसळली. यानंतर मंदिरात गोंधळ उडाला.सिंहगिरी बसस्थानकापासून वर जाताना मंदिराला लागून असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळील ही भिंत होती.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा २:३० ते ३ वाजेच्या दरम्यान मुसळधार पावसामुळे हा अपघात झाला. जिल्हाधिकारी हरेंद्र प्रसाद म्हणाले की, एनडीआरएफ आणि एसडीआरएफने बचावकार्य पूर्ण केले आहे.

राज्याच्या गृह आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री वंगालपुडी अनिता यांनीही तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. मुसळधार पावसामुळे माती ओली झाली, त्यामुळे भिंत कोसळल्याचे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि पीडितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे, असं त्यांनी सांगितलं.तसेच या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला. त्यांनी प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्‍ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. ‘पीएमओ इंडिया’ने एक्स या सोशल मीडिया साईटवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीमुळे अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो. तसेच या घटनेत जखमी झालेले नागरिक लवकर बरे व्हावेत हीच प्रार्थना. प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाइकांना प्रधानमंत्री राष्‍ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपयांची आणि जखमींना 50,000 रुपयांची मदत दिली जाईल.”

—————

You Might Also Like

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक

नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान

पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सिसोदिया आणि जैन यांच्या अडचणीत वाढ
Next Article ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रति क्विंटल 355 रुपये रास्त आणि किफायतशीर भाव

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?