Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या- सर्वोच्च न्यायालय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यात घ्या- सर्वोच्च न्यायालय

admin
Last updated: 2025/05/06 at 3:44 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली , 6 मे (हिं.स.)।राज्यात तब्बल 4 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आगामी 4 महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्था व महापालिकांच्या निवडणुका घेण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.2022 आधी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाच्या स्थितीनुसारच या निवडणुका घ्याव्यात. तसेच 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीसदर्भातील अधिसूचना काढण्यात यावी असे देखील सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

याप्रकरणी आज, मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत 4आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि 4 महिन्यांच्या आत निवडणूक घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. राज्यात 1994 ते 2022 पर्यंत ओबीसी आरक्षणाची जी स्थिती होती, त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेतली जावी. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान ‘या निवडणुका अडवून ठेवण्यात कोणतेही कारण आम्हाला दिसत नसल्याचे सांगितले. राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी अशी स्पष्ट सूचना सुप्रीम कोर्टाने दिली आहे. आगामी 4 आठवड्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांना आताच कामाला लागावे लागणार आहे.

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या गेल्या 4 वर्षांपासून रखडलेल्या आहेत. या निवडणुकीची घोषणा कधी होते याकडे सर्वच राजकीय पक्षांसोबत जनतेचे लक्ष लागले आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगर पंचायतीच्या निवडणुका आता 4 महिन्यांच्या आत होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्य सरकारला ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबर महिन्यात निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

You Might Also Like

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील दोन वारकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू

पावसाचा जोर वाढल्याने पुणे शहराला आठ महिने पुरेल एवढा पाणीसाठा जमा

एअर इंडियाकडून ४ कर्मचारी बडतर्फ, अहमदाबाद विमान अपघातानंतर कार्यालयात पार्टीचा व्हिडिओ व्हायरल

वक्फ आणि मंदिरे यांसाठी वेगवेगळे कायदे का? – हिंदु विधिज्ञ परिषद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खर्गेचे पंतप्रधानांना पत्र
Next Article महाराष्ट्रातील 16 शहरांमध्ये युद्धसराव मॉकड्रिल

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?