सोलापूर, 12 मे (हिं.स.)।
एवढे दागिने घालून कोठे निघालात, पुढे पोलिसांची कारवाई सुरू आहे’ अशी भीती दाखवून दुचाकीवरून आलेल्या चौघांनी दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या पती-पत्नीस वाटेत थांबवले. पोलिस कारवाईच्या भीतीने जयश्री लक्ष्मण दळवे (रा. पोखरापूर, ता. मोहोळ) यांनी तीन लाख २० हजार रुपयांचे दागिने काढून दिले. त्या दुचाकीस्वारांनी ते सगळेच दागिने चोरून नेल्याची फिर्याद दवळे यांनी मोहोळ पोलिसांत दिली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील नातेवाइकांच्या विवाहाला गेलेल्या जयश्री दवळे या पतीसह पोखरापूर या आपल्या गावी दुचाकीवरून निघाल्या होत्या. काही किमी त्यांचा पाठलाग करणाऱ्या दोन दुचाकीस्वारांनी त्यांना पंढरपूर रोडवरील अंजिक्यतारा हॉटेलजवळील काळे यांच्या पेट्रोल पंपाजवळ अडविले. ते दुचाकीस्वार म्हणाले, ‘पुढे पोलिसांची कारवाई सुरू असून तुम्ही एवढे दागिने कोठून आणले आणि का घातले, असे म्हणून काढून घेतील.