Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ईशान्य भारतात 1 लाख 25 हजार कोटींची गुंतवणूक होणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

ईशान्य भारतात 1 लाख 25 हजार कोटींची गुंतवणूक होणार

admin
Last updated: 2025/05/23 at 4:28 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

अंबानी 75 हजार आणि अदानी 50 हजार कोटी गुंतवणार

नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.) : ईशान्य भारतातील 8 राज्यांमध्ये येत्या 10 वर्षात 1 लाख 25 हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज 5 वर्षात 75 हजार कोटी आणि अदानी समूह 10 वर्षात 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. नवी दिल्लीच्या भारत मंडपम येथे आयोजित रायझिंग नॉर्थ-इस्ट इन्व्हेस्टर्स समिट-2025 मध्ये मुकेश अंबानी आणि गौतम अदानींनी याबाबत घोषणा केली.

याप्रसंगी मुकेश अंबानी यांनी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडसह ईशान्येकडील राज्यांसाठी रिलायन्स इंडस्ट्रीजचे धोरणात्मक व्हिजन सादर केले. भविष्यात, हे प्रदेश सिंगापूरसारख्या शेजारील देशांच्या यशाची प्रतिकृती बनलेले दिसतील असे अंबनी म्हणाले. तसेच ईशान्येकडील 8 राज्यांचा उल्लेख त्यांनी ‘अष्टलक्ष्मी’ असा केला. रिलायन्स इंडस्ट्रीज ईशान्येकडील राज्यांत गुंतवणूक दुपटीने वाढवेल. सर्व शाळा, रुग्णालये आणि घरांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणेल. तसेच या प्रदेशात सौरऊर्जेची निर्मिती वाढवणार असल्याचेही मुकेश अंबानी यांनी सांगितले. ईशान्य भारतातील रिलायन्सची सध्याची गुंतवणूक 30 हजार कोटी रुपये आहे. आता ही गुंतवणूक 75 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याची त्यांची योजना आहे.

यासोबतच अदानी समूह आगामी 10 वर्षांत ईशान्य भारतात 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी केली. अदानी समूहाने 3 महिन्यांपूर्वी आसाममध्ये 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले होते. यासोबतच गौतम अदानी यांनी आगामी 10 वर्षांत संपूर्ण ईशान्य भारतात 50 हजार कोटी रुपयांची अतिरिक्त गुंतवणुकीची घोषणा केली. ही गुंतवणूक विमानतळ, शहर गॅस वितरण, ट्रान्समिशन, सिमेंट आणि रस्ते पायाभूत सुविधा यासारख्या क्षेत्रांमध्ये असेल. यावेळी गौतम अदानी म्हणाले की, गेल्या दशकात, ईशान्येकडील प्रदेशात भारताच्या विकासाच्या गाथेचा एक नवीन अध्याय उलगडत आहे. विविधता, लवचिकता आणि वापर न झालेल्या क्षमतेची ही एक गोष्ट आहे. या उदयामागे एका नेत्याची दूरदृष्टी आहे जो सीमेच्या मर्यादा मानत नाही. केवळ सुरुवात करतो. पंतप्रधान, तुम्ही जेव्हा पूर्वेकडे जलद आणि प्रथम लक्ष द्या, असे म्हटले, तेव्हा तुम्ही ईशान्येचे लक्ष वेधले असे अदानी यांनी सांगितले.

You Might Also Like

शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय

भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू

नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड

देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन

कुलगाममध्ये चकमकीत एक दहशतवादी ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवरील चकमकीत 4 नक्षलवादी ठार
Next Article इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु – मुख्यमंत्री

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?