Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मोर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भर पावसात डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मोर्चा

admin
Last updated: 2025/05/26 at 4:22 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

डोंबिवली, 26 मे (हिं.स.)। कष्टकरी हॉकर्स व भाजी विक्रेता युनियन आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हातगाडी, पथारी असोसिएशन महाराष्ट्र राज्य माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह प्रभाग क्षेत्र कार्यालयावर पार्किंग फलक हटवण्यात यावे आणि फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी भर पावसात धरणे आंदोलन करण्यात आले.

पूर्व -पश्चिम विभागातील रस्त्यावरती पार्किंगची बोर्ड लावले तर गाड्या पार्किंग होणार मग फेरीवाले जाणार कुठे? असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे. डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते रोड वरील पार्किंग फलक पी वन, पी टू ची अधिसूचना सन २०१७ रद्द झाली पाहिजे. ज्या ठिकाणी फेरीवाले बसत नाहीत त्या ठिकाणी पार्किंगचे फलक लावल्यास आमचा विरोध नाही. पथविक्रेता उपजीविकेचे संरक्षण व पथविक्रीचे विनियमन अधिनियम २०१४ फेरीवाल्याच्या असलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी लावून धरल्या. अधिकृत फेरीवाल्यांचे रक्षणकर्ते व्हा भक्षणकर्ते बनू नका असा नाराही दिला. पालिकेच्या ह प्रभागक्षेत्र साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांना आज (सोमवार २६ मे) फेरीवाला जागतिक दिवस आहे याची आठवणही मोर्चाच्या शिष्टमंडळाने करून दिली.

दरम्यान ह प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत.यांना निवेदन देण्यात आले. सदर आंदोलनामध्ये विष्णुनगर पोलीस ठणेतर्फे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.

याच मुद्यावर मागे म्हणजे दि.१६ मे २०२५ रोजी इंदिरा गांधी चौक डोंबिवली पूर्व येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते . आज ह प्रभागक्षेत्र कार्यालयावर धरणे आंदोलन पुढे सात दिवसांत योग्य न्याय प्रशासनांने दिला नाही तर पुढील आंदोलन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयावर करणार असेही जाहीर केले.

सदर मोर्चात अमोल केंद्रे , बबन कांबळे, दिपक भालेराव, अभयलाल दुबे, राजू गुप्ता, काळुबाई गायकवाड, राकेश सिंग, लवजारी गुप्ता या शिष्टमंडळच्या नेतृत्वाखाली शेकडो फेरीवाले सहभागी झाले होते.

You Might Also Like

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन

भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक

गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरात पाऊस अन्‌ दमटपणा कोकणासारखाच
Next Article अक्कलकोट तालुक्यात काँग्रेस मजबूत – खा. प्रणिती शिंदे

Latest News

राज्य, धर्म व भाषेपेक्षा अधिक मातृभूमीचा अभिमान बाळगावा – राज्यपाल
महाराष्ट्र May 30, 2025
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन
महाराष्ट्र May 30, 2025
नवीन वेळापत्रकानुसार कंपनीने ई-बसेसचा पुरवठा करावा – प्रताप सरनाईक
देश - विदेश May 30, 2025
भंडाऱ्यात लुटणाऱ्या चौघांना अटक
महाराष्ट्र May 30, 2025
गोंदियात इलेक्ट्रिक खांबावरील अॅल्युमिनियम तारांची चोरी करणारी टोळी जेरबंद, ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त
महाराष्ट्र May 30, 2025
नव्या भारताने प्रतिशोधाची नवी ताकद दाखवली – पंतप्रधान
देश - विदेश May 30, 2025
राज्यात धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद
महाराष्ट्र May 30, 2025
पाकिस्तानी मुस्लिमांनी धर्म विचारून हुिंदुंना मारले- प्रज्ञा ठाकूर
देश - विदेश May 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?