Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पाकिस्तानच्या विनंतीवर झाला युद्धविराम- एस. जयशंकर
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

पाकिस्तानच्या विनंतीवर झाला युद्धविराम- एस. जयशंकर

admin
Last updated: 2025/05/27 at 5:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

बर्लिन, 27 मे पाकिस्तानी सैन्याच्या विनंतीवर भारत-पाकिस्तान युद्धविराम झाल्याचे प्रतिपादन देशाचे परराष्ट्रमंत्री एस.

जयशंकर यांनी केले. जर्मनीत बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारतीय खासदारांचे शिष्टमंडळ जगभरातील अनेक देशांमध्ये जाऊन भारताची बाजू मांडत आहे. तसेच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील विविध देशांमध्ये जाऊन भारताची भूमिका मांडत आहेत.याचदरम्यान, एस. जयशंकर जर्मनी दौऱ्यावर असताना, भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी अमेरिकेचे आभार मानायला हवेत का..? असा प्रश्न एस. जयशंकर यांना विचारण्यात आला होता. यावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले की, युद्धविरामासाठी भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये थेट संपर्क झाला होता. त्यातच युद्धविरामावर सहमती झाली होती. आम्ही पाकिस्तानचे मुख्य हवाई तळ आणि संरक्षण प्रणालींना प्रभावीपणे लक्ष्य केले होते. त्यामुळे युद्धविरामासाठी कोणाचे आभार मानावे ? मला वाटते की, भारतीय सैन्य. कारण भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईमुळेच पाकिस्तानला असे म्हणण्यास भाग पाडले की, आम्ही लढाई थांबवण्यास तयार आहोत.

दरम्यान, भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान जग अणुयुद्धापासून किती दूर होते? असाही प्रश्न एस. जयशंकर यांना विचारण्यात आला होता. यावर, खरे सांगायचे तर, मला या प्रश्नाचे आश्चर्य वाटते. आम्ही दहशतवाद्यांचे अड्डे अचूकपणे उद्ध्वस्त केले. कोणत्याही नागरिकाचे नुकसान केले नाही. या काळात संघर्ष वाढेल, असे कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. यानंतर पाकिस्तानी सैन्याने आमच्यावर हल्ला केला. पण आम्ही त्यांना दाखवून दिले की, आम्ही काय करू शकतो. आम्ही त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केली. त्यांच्या मागणीवरून गोळीबार थांबवण्यात आला. परंतु या काळात कधीही अणुहल्ल्याची चर्चा झाली नाही असे त्यांनी सांगितले

You Might Also Like

खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल

भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक

इलॉन मस्क करणार नव्या राजकीय पक्षाची घोषणा ?

पाकिस्तानचे माजी खासदार अब्बास अफरीदी स्फोटात जखमी, उपचारादरम्यान मृत्यू

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणी केसीए सचिव आणि खजिनदारांचा राजीनामा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article बांगलादेश आर्मीचा कॉरिडॉर सुरू करण्याच्या अंतरिम सरकारच्या प्रस्तावावर आक्षेप
Next Article कर्नाटक : भाजपच्या 2 आमदारांची पक्षातून हकालपट्टी

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?