Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सावरकर एक अलौकिक प्रतिभावान पुरुष – महंत सुधीर दास
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सावरकर एक अलौकिक प्रतिभावान पुरुष – महंत सुधीर दास

admin
Last updated: 2025/05/29 at 5:26 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

डोंबिवली, २९ मे (हिं.स.) : “हिंदू धर्माबाबत सावरकरांची मते वेगळी होती, पण राष्ट्रहितासाठी त्यांनी क्रांतीचे विचार रुजवले. त्यामुळे असा अलौकिक प्रतिभावान पुरुष सहस्त्रामध्ये एकदाच जन्माला येतो, असे विशेषोद्गार महंत सुधीर दास यांनी काढले. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, डोंबिवली विभागातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी, अभ्यासक आणि प्रथितयश वक्ता पार्थ बावस्कर, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निखिल लातूरकर, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष

श्रीनिवास कुलकर्णी, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, डोंबिवली अध्यक्ष शशांक खैर उपस्थित होते.

पुढे महंत पाकिस्तानवर टीका करताना म्हणाले, “पाकिस्तान हे नाठाळ राष्ट्र आहे, तो सुधारणार नाही. अशा वेळी देशाला सावरकरांच्या विचारांची गरज आहे. देशावर जेव्हा हल्ले होतात, तेव्हा सत्याग्रह करून चालत नाही.”

सावरकर अभ्यासक पार्थ बावस्कर यांनी सावरकरांविषयी पसरवल्या जाणाऱ्या अपप्रचारावर टीका केली. “सावरकरांना ‘माफीवीर’ ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र सावरकरांचा खरा इतिहास समोर आणणे ही आजची गरज आहे.” त्यांनी अंदमानमधील सावरकरांनी भोगलेल्या हाल अपेष्टांचा आणि त्यागाचा उल्लेख करत ‘हिंदुत्व’ ही त्यागातून निर्माण झालेली संकल्पना असल्याचे सांगितले. “हिंदुत्व म्हणजे काय, हे प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना समजावून सांगावे,” असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान ऑपरेशन सिंदूरमधील हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले जावे, यासाठी सह्यांची मोहीमही राबविण्यात आली.

—————

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात मान्सूनचं आगमन; पुढील ६-७ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा
Next Article जम्मू-काश्मीर : लश्करच्या 2 दहशतवाद्यांचे आत्मसमर्पण

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?