Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

भारताला बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज – स्वामी गोविंददेव गिरी

admin
Last updated: 2025/05/29 at 6:03 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 29 मे (हिं.स.) : मानवजातीला सुखी ठेवायचे असेल तर भारताचा धर्मविचार टिकायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच संस्कृतीच्या संरक्षणासाठी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. आज राष्ट्र रक्षणासाठी बौद्धिक छात्रधर्म जागविणाऱ्या शिवरायांची गरज आहे, असे प्रतिपादन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.

अभिजित जोग लिखित ‘भारत ः सत्य, सत्व, स्वत्व’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटच्या काळे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला संशोधक व लेखक नीलेश ओक, भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय धर्मजागरण प्रमुख शरद ढोले, लेखक अभिजित जोग आदि उपस्थित होते. भारताला स्वत्वाची जाणिव होण्याची आवश्यकता गोविंददेव गिरीजी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “गेली २०० वर्षे आपल्या स्मृती पुसून टाकण्याचे प्रयोग झाले. त्यामुळे आपली ओळख नक्की कोणती, हा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यामुळे आज सत्यान्वेशी लोकांचा शोध घेण्याची आवश्यकता आली आहे. नाहीतर काल परवा जे बांगलादेशात घडले, पश्चिम बंगालमध्ये जे नमुना म्हणून घडतेय ते पुण्यात घडायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आपल्यातील शिवचैतन्य जागृत करण्याची आवश्यकता आहे.”

सहिष्णूता आणि सर्वसमावेशकता हे भारताचे अविभाज्य अंग आहे. त्याच्या पुनर्निर्माणाची संधी आली तेंव्हा आपण करंटे ठरलो, असे मत श्याम जाजू यांनी मांडले. तर, इंडियाला भारत समजून घ्यायचा असेल तर हे पुस्तक उत्तम असल्याचे मत ढोले यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, “आपली भाषा, ज्ञान, विचार, संस्कृती याची ज्याला विस्मृती झाली आहे असे लोक इंडियात राहतात. आज भारतामध्ये इंडिया आणि भारत असे दोन्ही विचारप्रवाह राहतात. भारताला आपला वैचारिक लढा देण्यासाठी हे पुस्तक महत्त्वपूर्ण ठरेल.” नीलेश ओक यांनी पुस्तकाचे महत्त्व स्पष्ट केले. या पुस्तकातून प्रत्येकाने एक कृती आत्मसात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

———————-

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरात पाणी गेलेल्या नागरीकांना दहा हजार रुपयांची मदत – उपमुख्यमंत्री पवार
Next Article सोलापूर-मुंबई विमानसेवा महिन्यात सुरू करण्याचा प्रयत्न

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?