लंडन, 7 जून (हिं.स.)
भारताचा धडाकेबाज फंलदाज के. एल
राहुलने इंग्लंडमध्ये शानादर शतक झळकावलं आहे. त्याने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या
अनौपचारीक कसोटी सामन्यात हे शतक झळकावत आगामी कसोटी मालिकेसाठी आपण सज्ज असल्याचं
दाखवून दिलं. त्याचप्रमाणे यशस्वी जयस्वालबरोबर कसोटी मालिकेत सलामीला कोण येणार
हा प्रश्न भारतीय संघव्यवस्थापनाला भेडसावत होता. त्याचं उत्तर राहुलच्या शतकामुळे
मिळालं आहे.
इंडियन प्रिमियर लीगमध्ये दिल्ली
कॅपिटल्सचं आव्हान साखळी सामन्यांमध्ये संपुष्टात आल्यानंतर के. एल. राहुलने
संघव्यवस्थापनाला भारतीय ‘अ’
संघाकडून दुसराअनौपचारीक
कसोटी सामना खेळण्याची परवानगी मागितली होती. ही परवानगी मिळाल्यामुळे राहुल
इंग्लंड लायन्सविरुद्धचा दुसरा सराव सामना खेळू शकला. हा सामना खेळत त्याने शतक
पूर्ण केल्याने भारतीय गोटात आनंदाचं वातावरण आहे. त्याने १६८ चेंडूत ११६ धवांची
खेळी केली. यामध्ये १५ चौकार आणिएका उत्तुंग षटकाराचा समावेश होता. त्याच्या शतकी
खेळीमुळे भारत अ संघाला दिवसअखेर ७ बाद ३१९ धांपर्यंत मजल मारता आली. तर ध्रुव
जुरेलने अर्धशतक ठोकत राहुलला चांगली साथ दिली.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी
मालिकेला २० जूनला सुरुवात होतेय. त्यापूर्वी लयीत परतण्याची के.एल. राहुलला या
अनौपचारीक कसोटी सामन्यात नामी संधी होती. त्यानंही या संधीचा फायदा घेत शतक ठोकत पाच
कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आपले इरादे स्पष्ट केले आहेत. रोहित, शर्मा, विराट
कोहली आणि आर. अश्विन यांच्या शिवाय भारतीय संघाला या कसोटी मालिकेत चमकदार
कामगिरी करण्याचं आव्हान आहे. रविंद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह आणि के. एल राहुल हे
केवळ तीनच अनुभव क्रिकेटपटू संघात आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या दौऱ्यात शुभमन गिलच्या
संघाची चांगलीच कसोटी लागणार आहे.