Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी राजकीय पक्षांकडून विशेष बस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी राजकीय पक्षांकडून विशेष बस

admin
Last updated: 2025/06/12 at 4:20 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 12 जून (हिं.स.)। महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सर्वच राजकीय पक्षांनी गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी मोफत प्रवास घडवून आणण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालवण्यासह एसटी व खासगी बस आरक्षित करण्यात येणार आहेत.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीमुळे मतदारांना विशेषत: चाकरमान्यांना खूश करण्यासाठी येणार्‍या काळात राजकीय पक्षांचे प्रयत्न राहणार आहेत. निवडणुकीपूर्वी गणेशोत्सव येत असल्यामुळे यावेळी भाजपासह शिवसेना, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग रत्नागिरी व रायगड जिल्ह्यात विशेष बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय या बस चालवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

राजकीय पक्षांच्या मोफत गाड्यांची घोषणा ऑगस्टमध्ये होण्याची शक्यता आहे. या गाड्यातून मोफत प्रवास करण्यासाठी चाकरमान्यांना आगाऊ आसन आरक्षित करावे लागणार आहे. यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयात तिकीट आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

भाजपाने मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यातून पहिल्या टप्प्यात एक हजारापेक्षा जास्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांची मागणी वाढल्यास बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. अतिरिक्त बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भाजपाने एसटी महामंडळाला राज्याच्या विविध जिल्ह्यातून बस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. या बस उपलब्ध करून देण्यासाठी लवकरच एसटी महामंडळाला पत्र दिले जाणार आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणात चाकरमानी जात असल्यामुळे रेल्वेच्या नियमित गाड्यांसह विशेष गाड्याही हाउसफुल होतात. त्यामुळे राजकीय पक्षांमार्फत सोडण्यात येणार्‍या बसचा चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे. एसटी बसची संख्या अपुरी पडल्यास खासगी बसही भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. तशी विचारनाही खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडे करण्यात आली आहे.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देशाच्या विविध राज्यांत उष्णतेची लाट
Next Article लोणावळा आणि मावळ तालुक्यातील सर्व पर्यटनस्थळावंर बंदीचे आदेश

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?