Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बच्चू कडू यांनी उपोषणाच्या रूपानं उतारा शोधला की काय अशी चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

बच्चू कडू यांनी उपोषणाच्या रूपानं उतारा शोधला की काय अशी चर्चा

admin
Last updated: 2025/06/15 at 3:24 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

अमरावती, 15 जून (हिं.स) बच्चू कडू म्हणजे एक आक्रमक आणि थेट बोलणारा नेता. सरकारच्या चुकांवर बोट ठेवणारा, कुणालाही न घाबरणारा कुणाचंही न ऐकणारा, बेधडक भाष्य करणारा नेता. शेतकऱ्यांचे प्रश्न असोत, अपंगांची गरज असो किंवा ग्रामविकासाचा मुद्दा — बच्चू कडू नेहमीच आवाज उठवत आले. पण हेच बच्चू कडू २०२४ च्या निवडणुकीत जोरदार पराभूत झाले आणि त्यांच्या किंगमेकर हेण्याच्या स्वप्नांची धूळधाण झाली. हा पराभव कडूंना सक्रिय राजकारणातून बाजूला नेणारा ठरला आणि मग आता त्यावर बच्चू कडू यांनी उपोषणाच्या रूपानं उतारा शोधला की काय अशी चर्चा राज्यात रंगली आहे.

आता प्रश्न असा आहे की, बच्चू कडूंचं हे उपोषण खरंच जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसाठी आहे का? की आपलं हरवलेलं राजकीय वजन परत मिळवण्यासाठी? त्यांच्या मागण्या महत्त्वाच्या आहेतच जसे, शेतकऱ्यांची कर्जमाफी, शेतमजुरांचे हक्क, दिव्यांगांचं जीवनमान, विधवा महिलांचे प्रश्न, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं भविष्य, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा, हे सगळं महत्वाचं आहेच. पण हेच प्रश्न बच्चू कडूं मंत्री असतानाही सोडवू शकले असते. शालेय शिक्षण, जलसंपदा, कामगार, सामाजिक न्याय अशी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती.

सत्तेसाठी बच्चू कडू थेट गुवाहाटीपर्यंत गेले, शिंदे गटात सामील झाले, महायुतीचा भाग झाले. मंत्रिमंडळात सामीलही झाले. पण, तिथं निर्णय घेण्याची किंवा काम करण्याची संधी लाभली असतानाही हे प्रश्न त्यांनी तेव्हा का उचलले नाहीत? आता विरोधात गेल्यावर हे सगळे प्रश्न का आठवलेत? खरोखरच बच्चू कडू यांचं हे उपोषण आणि राजकीय समीकरण यांचा काही संबंध आहे का? असा प्रश्न आता या निमित्याने समोर आला आहे.

“राजकारणात उपोषण हे पावसासारखं असतं… जसं नदीला प्रवाहीत व्हायला पाऊस लागतो, तसंच राजकीय प्रवाहात राहण्यासाठी राजकारण्यांना उपोषण, आदोलनांची गरज भासते.” पण प्रश्न असा आहे सत्ता हातात असताना या प्रश्नांवर काम का केलं नाही? तेव्हा या प्रश्नांची सोडवणूक का झाली नाही? आजही भाजप असो किंवा शिंदे गट बच्चू कडूंच्या या उपोषणाकडे फारसं लक्ष देताना दिसत नाहीत. त्यांची मागणी सरकारकडून दुर्लक्षित होतेय का? की दोन्ही पक्ष बच्चू कडूंचं महत्त्व कमी करायचा डाव खेळतायत?

काँग्रेस, शरद पवार गट यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा या आंदोलनाला आहे. मग हे उपोषण म्हणजे खरंच जनहितासाठी आहे का? की नव्या राजकीय समीकरणांची चाचपणी? एकंदरीत बच्चू कडूंच्या मागण्या महत्त्वाच्या आहेत हे मान्यच… पण त्या मागे आपलं राजकीय अस्तित्व परत मिळवण्याचा प्रयत्न आहे का हा प्रश्न तसाच अनुत्तरित आहे. येणाऱ्या काळात या प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील.अशी अपेक्षा करु या.

You Might Also Like

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर

शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे

सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले

राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्तव्यादरम्यान झालेल्या वादानंतर बीएसएफ जवानाकडून सहकाऱ्याची गोळ्या घालून हत्या
Next Article अमरावती – दोन साधुंनी उडवली व्यापाऱ्याची चैन

Latest News

महाराष्ट्रासह १६ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
महाराष्ट्र June 16, 2025
मोदी सरकारने ११ वर्षांत देशाच्या सीमेसह अर्थव्यवस्था मजबूत केली – प्रविण दरेकर
महाराष्ट्र June 16, 2025
शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 16, 2025
सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
महाराष्ट्र June 16, 2025
विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Top News June 16, 2025
राज्यातील धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे – उपसभापती नीलम गोऱ्हे
महाराष्ट्र June 16, 2025
पंतप्रधान मोदींना सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान
देश - विदेश June 16, 2025
इराणमध्ये अडकले १५०० भारतीय विद्यार्थी, सरकार आणणार मायदेशी
देश - विदेश June 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?