Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

सरकारी योजनांचे दरवाजे ५५० भटके विमुक्तांना खुले

admin
Last updated: 2025/06/16 at 4:50 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

पुणे, 16 जून (हिं.स.) : स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही भटक्या विमुक्त समाजातील नागरिक सरकारी योजनांपासून कोसो दूर आहेत. पाठीवर बिऱ्हाड आणि हातावरच पोट असलेल्या या नागरिकांना त्यांचाच ठाव ठिकाणा माहिती नसतो. त्यामुळे सरकारी कागदपत्रांच्या जाचक नियमापासून ते दूरच असतात. म्हणूनच त्यांच्यापर्यंत सरकारी योजना पोहोचविण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषद आणि भारतीय सिकलीकर संघटना प्रयत्नशिल आहेत. नुकतेच त्यांनी तब्बल ५५० सिकलीकर वैदू आणि मांगगारुडी समाजातील नागरिकांना जातीच्या दाखल्याचे वाटप केले आहे. राजे उमाजी नाईक महाराज स्वाभिमान योजनेअंतर्गत भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना जातीचे दाखले वाटप करण्यात आले.

या वेळी हडपसरचे मंडलाधिकारी शेखर शिंदे, परिषदेच्या प्रदेश कार्यकारणी सदस्य शुभांगी तांबट, परिषदेचे हितरक्षा प्रमुख डॉ. जितेंद्र ठाकूर, शिवसेनेचे पुणे जिल्हा प्रवक्ते अभिजीत बोराटे, सिकलीकर संघटनेचे अध्यक्ष चांदसिंग कल्याणी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांनी भारतमाता, महाराजा रणजीतसिंग, राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रामुख्याने भटके विमुक्त समाजातील सिकलीकर वैदू व मांगगारुडी समाजातील ५५० नागरिकांना जातीचे दाखले मंडल अधिकाऱ्यांच्या हस्ते देण्यात आले.

समाजातील होतकरू आणि दुर्लक्षित घटकाला जातीचे दाखले उपलब्ध केल्याबद्दल चांदसिंग कल्याणी यांनी प्रशासनाचे आभार मानले. तसेच संघटनेचे शक्तिसिंग कल्याणी यांनी येणाऱ्या काळामध्ये जातीच्या दाखलांचा फायदा कसा होईल, याची माहिती दिली शुभांगी तांबट यांनी परिषदेचे काम कसे चालते याबद्दल माहिती दिली. कार्यक्रमाला नगरसेवक मारुती तुपे, गुरूद्वारा गुरुनानक दरबार साहिबचे प्रधान चरंजीतसिंग सहानी, डॉ. जितेंद्र ठाकुर, पालावरची शाळांच्या शिक्षिका आदि उपस्थित होते. भगतसिंग कल्याणी यांनी आभार मानले. —————

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article विद्यार्थ्यांनी आवडीच्या विषयामध्ये करिअर करावे- आ. संग्राम जगताप
Next Article शाळा हे संस्कार घडविणारे मंदिर – उपमुख्यमंत्री शिंदे

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?