लंडन, 25 जून (हिं.स.)।
लीड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाला इंग्लंडकडून
पराभव सहन करावा लागला. मात्र, या पराभवाची सव्याज परतफेड भारताच्या युवा संघाने
केली. आयुष्य म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघाने इंग्लंड यंग लायन्सचा २३१
धावांनी पराभव केला.
भारतीय अंडर-१९ संघाने ५० षटकात इंग्लंड यंग
लायन्स विरोधात ९ बाद ४४२ धावा केल्या. हरवंश पंगालियाने नवव्या क्रमांकावर
फलंदाजीसाठी येत भारतीय संघाकडून शतकी खेळी केली. त्याने ५२ चेंडूत १०३ धावांची स्फोटक
खेळी केली. दरम्यान, कर्णधार आयुष म्हात्रे आणि आयपीएलमध्ये आपली छाप सोडणाऱ्या
वैभव सुर्यवंशीला मात्र या सामन्यात प्रभाव पाडता आला नाही. ९१ धावात ५ फलंदाज
गमावल्यानंतरही भारताने धावांचा डोंगर उभा केला.
भारताकडून सर्वाधिक तीन विकेट्स या दीपेश देवेंद्रन
याने घेतल्या. तर नमन पुष्पक आणि विहान म्हलोत्राने इंग्लंडच्या प्रत्येकी दोन
फंलदाजांना बाद केले. या विजयासह भारताने मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.