नवी दिल्ली, 28 जून (हिं.स.)
एअर
इंडिया एआयएसएटीएसच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे.
याचे कारण एक व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ गुरुग्राममध्ये झालेल्या एका पार्टीचा आहे. जो
सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नागरिक खूप संतापले
आहेत. एअर इंडियाच्या फ्लाइट एआय १७१ च्या अपघाताच्या काही दिवसांनंतर ही घटना
घडली. १२ जून २०२५ रोजी झालेल्या या अपघातात जवळपास २७५ जणांचा मृत्यू झाला होता. ज्यामुळे
संपूर्ण देश शोकाकुल झाला होता.
एआयएसएटीएसने
यावर एक निवेदन जारी केले आहे. कंपनीने म्हटले आहे की, ‘एआयएसएटीएस एआय १७१च्या दुःखद अपघातात बाधित झालेल्या
कुटुंबांसोबत आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांनी असा व्हिडिओ बनवला याचे आम्हाला खूप दुःख
आहे. हा व्हिडिओ आमच्या कंपनीच्या मूल्यांच्या विरुद्ध आहे. यासाठी जबाबदार
असलेल्यांवर आम्ही कठोर कारवाई केली आहे. आम्हाला असेही म्हणायचे आहे की, आम्ही
नेहमीच लोकांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत आणि जबाबदारीने काम करतो.’
व्हिडिओमध्ये
AISATS चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि काही
कर्मचारी मोठ्या आवाजात गाण्यांवर नाचताना दिसत होते. ही पार्टी अशा वेळी झाली
जेव्हा देश एका मोठ्या हवाई अपघाताशी झुंजत होता. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे
कुटुंब त्यांच्या मृतदेहांची वाट पाहत असतानाहा व्हिडिओ समोर आला. हा व्हिडिओ
पाहिल्यानंतर लोकांनी कंपनीवर टीका केली. सोशल मीडियावर अनेक लोकांनी म्हटले की,
कंपनीकडे सहानुभूती आणि समजूतदारपणाचा अभाव आहे.