Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top News

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

admin
Last updated: 2025/07/04 at 8:24 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

वाशिम, 4 जुलै (हिं.स.)। समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असताना गुरुवारी (३ जुलै) रात्री आणखी एक भीषण अपघात झाला. वाशिम जिल्ह्यात झालेल्या या अपघातात नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून गाडीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. सध्या चालक चेतन हेलगे याची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

या भीषण अपघातात राधेश्याम जैसवाल (६७), माधुरी जैसवाल (५२), वैदही जैसवाल (२५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संगीता जैसवाल (५५) यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री आठच्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला आणि गाडी अनियंत्रित होत महामार्गाच्या कडेला असलेल्या संरक्षक पट्ट्यांना जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले .

दरम्यान, या अपघातामागे चालकाला डुलकी आल्याचा किंवा अतिवेगाचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमुळे जैसवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून उमरेड परिसरात शोककळा पसरली आहे. सातत्याने होणाऱ्या अपघातांनी समृद्धी महामार्गावरील सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे, तसेच प्रशासनानेही उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.

You Might Also Like

ब्रिटनने रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या भारतीय कंपनीवर लावले निर्बंध

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

सरन्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न, लातूरातील वकिलांनी काढला मोर्चा

जर यावेळी युद्ध झाले, तर पाकिस्तानचा मोठा विजय होईल – पाक संरक्षणमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेस : शरद पवारांचे असंख्य कार्यकर्ते अजित पवारांकडे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे 63 जणांचा मृत्यू 40 बेपत्ता
Next Article बाजीरावांच्या पुतळ्यासाठी एनडीएचीच जागा योग्य- अमित शाह

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?