Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वर्धा : गांधीवादी संस्थांमध्ये नक्षलवाद्यांची घुसखोरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

वर्धा : गांधीवादी संस्थांमध्ये नक्षलवाद्यांची घुसखोरी

admin
Last updated: 2025/07/13 at 4:10 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

भाजप आमदार सुमित वानखेडे यांचा गंभीर आरोप

नागपूर, 13 जुलै (हिं.स.) : वर्धा जिल्ह्यातील विविध गांधीवादी संस्थांमध्ये नक्षलवाद्यांनी घुसखोरी केल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी केला आहे. वर्धेतील अनेक संस्थांमध्ये सेमिनार, बैठक आणि प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून माओवादी विचारसरणीचा प्रचार केला जात आहे.

याबाबत आमदार वानखेडे म्हणाले की, भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांनी महाविकास आघाडीला अप्रत्यक्ष मदत केली. त्याच मदतीची परतफेड म्हणून आता महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला विरोध केला जात आहे. राज्यातील शहरी माओवादी फ्रंटल ऑर्गनायझेशनवर कारवाई करण्यासाठी हे विधेयक अत्यावश्यक असल्याचे आ. वानखेडे म्हणाले.

गांधीवादी संस्थांवर नक्षलवाद्यांचे वर्चस्व

आमदार वानखेडे यांच्या मते, वर्धेतील अनेक गांधीवादी आणि सामाजिक संस्था आता शहरी नक्षलवाद्यांच्या प्रभावाखाली आहेत. गांधींनी देशाला अहिंसेच्या तत्त्वावर स्वातंत्र्य मिळवून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले. परंतु नक्षलवादी बंदुकीच्या नळीतून क्रांती घडवू पाहतात. त्यांना 2047 पर्यंत भारतात चीनसारखी सशस्त्र सत्ता घडवायची असल्याचे वानखेडे यांनी सांगितले.

संविधानाच्या नावाखाली संभ्रमाचे वातावरण

वानखेडे यांनी आरोप केला की नक्षलवादी विचारसरणीचे लोक लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारासाठी सक्रिय होते. त्यांनी तरुण, वकील, महिला यांच्यात कार्यरत असलेल्या विविध फ्रंटल संघटनांच्या मदतीने निवडणुकीत प्रचार केला आणि “संविधान धोक्यात आहे” असा खोटा नरेटिव्ह निर्माण केल्याचे आमदार वानखेडेंनी सांगितले.

सामाजिक विभाजन आणि असंतोषाचा डाव

“दलित, आदिवासी, बेरोजगार तरुण आणि गरीब शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे कटकारस्थान थांबवण्यासाठी कायदा आवश्यक आहे,” असे वानखेडे यांनी ठामपणे सांगितले. तसेच, आज भाजप सत्तेत असला तरी उद्या सत्तांतर झाले, तरी हे माओवादी कुणालाही नुकसान पोहोचवू शकतात, असा इशाराही वानखेडे यांनी दिला.

खऱ्या गांधीवाद्यांनी सावध राहावे – वानखेडे

नक्षलवाद्यांची गांधीवादी संस्थांमध्ये घुसखोरी झालेली असून, त्यातून देशाच्या ऐक्याला आणि लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खऱ्या गांधीवाद्यांनी आता सावध व्हायला हवे असा सल्ला वानखेडेंनी दिला. राज्य व केंद्र सरकार वर्ध्यातील परिस्थितीकडे गंभीरतेने पाहत असून, कायदा पारित झाल्यामुळे लवकरच योग्य ती कारवाई होईल, असा विश्वास वानखेडे यांनी व्यक्त केला. ————————

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article राज्यात वातावरणात अस्थिरता; पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Next Article अमरनाथ यात्रेत दहाव्या दिवशी १९,०२० भाविक सहभागी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?