Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चीन-अमेरिकेच्या मध्यस्थीने थायलंड-कंबोडिया संघर्षावर युद्धबंदीची घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

चीन-अमेरिकेच्या मध्यस्थीने थायलंड-कंबोडिया संघर्षावर युद्धबंदीची घोषणा

admin
Last updated: 2025/07/28 at 6:30 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

क्वालालंपूर, 28 जुलै – थायलंड आणि कंबोडिया यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सीमावादामुळे निर्माण झालेला तणाव अखेर निवळला असून, दोन्ही देशांनी कोणत्याही अटीशिवाय युद्धबंदी जाहीर केली आहे. कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट यांनी सोमवारी युद्ध थांबवण्याची घोषणा केली. या युद्धबंदीमध्ये चीन, अमेरिका आणि मलेशियाचा मध्यस्थीचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.

मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथे सोमवारी थायलंड, कंबोडिया आणि मलेशियामधील शांतता चर्चासत्र पार पडले. यामध्ये थायलंडचे कार्यवाहक पंतप्रधान फुमथम वेचायचाई आणि कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट सहभागी झाले होते. या बैठकीनंतर मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी युद्धबंदीची अधिकृत घोषणा केली.

तीव्र संघर्ष, नागरिकांचा मृत्यू

सीमा भागात सुरु असलेल्या गोळीबारामुळे आतापर्यंत ३३ लोकांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये अनेक सामान्य नागरिकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत होता.

अमेरिकेचा दबाव आणि मलेशियाची भूमिका

२६ जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट हस्तक्षेप करत थायलंड आणि कंबोडियाला तात्काळ युद्धबंदी लागू करण्याची चेतावणी दिली होती. अन्यथा व्यापार संबंध तोडण्याचा इशारा त्यांनी दिला होता. तरीही संघर्ष सुरूच राहिल्यानंतर मलेशियाने दोन्ही देशांना चर्चेसाठी निमंत्रित करत मध्यस्थीची भूमिका बजावली.

प्रेम विहार मंदिरातून सुरू झालेला वाद

हा सीमावाद नवीन नाही. १९६२ मध्ये युनेस्कोने प्रेम विहार मंदिर कंबोडियाच्या भूभागात असल्याचे मान्य केले होते. मात्र, थायलंडने या निर्णयाला आक्षेप घेतला होता. २००८ मध्ये या मंदिराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर वाद अधिकच पेटला. २००८, २०११ आणि २०१५ मध्ये याच वादातून तणावपूर्ण चकमकी झाल्या होत्या.

आता पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला असताना, आंतरराष्ट्रीय दबावामुळे आणि मलेशियाच्या पुढाकारामुळे युद्धबंदी शक्य झाली आहे. मात्र, युद्धबंदीच्या अटी आणि याआधी झालेल्या नुकसानीवर चर्चा अद्याप सुरूच आहे.

You Might Also Like

रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?

आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत

उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक

कमर्शिअल सिलेंडर स्वस्त; घरगुती गॅसच्या दरात बदल नाही

अमेरिकेचा भारतावर २५% टॅरिफ ७ ऑगस्टपासून लागू; कॅनडावर आजपासून ३५% शुल्क

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वादग्रस्त मंत्री, आमदारांविरोधात कारवाई करा; अन्यथा सर्वोच्च न्यायालयात जाऊ – अंबादास दानवे यांचा इशारा
Next Article खेवलकरांच्या चाचणी अहवालावरून खडसेंचा ससून रुग्णालयावर संशय

Latest News

सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी – राम सातपुते
सोलापूर August 1, 2025
मंगळवेढामधील महावितरणची कामे लागणार मार्गी – आ. समाधान आवताडे
सोलापूर August 1, 2025
सोलापूरात सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिन
सोलापूर August 1, 2025
रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?
देश - विदेश August 1, 2025
लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
महाराष्ट्र August 1, 2025
आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
देश - विदेश August 1, 2025
काँग्रेसनेच रचले भगव्या दहशवादाचे षडयंत्र – मुख्यमंत्री
महाराष्ट्र August 1, 2025
“त्यावेळी सरसंघचालकांना पकडण्याचे आदेश होते” – महिबूब मुजावर
सोलापूर August 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?