Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे अभिवादन

admin
Last updated: 2025/08/01 at 5:59 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 1 ऑगस्ट।
राज्यातील भाजपा युती सरकार हे “बेशरम आणि लाचार” आहे. विधानसभेत रमी खेळणाऱ्या मंत्र्यांचा राजीनामा न घेता त्यांनाच क्रीडा मंत्रालय देऊन सन्मान केला गेला. “कदाचित पुढे रमीला ऑलिंपिक दर्जा देतील आणि त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारही देतील,” असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी चढवला.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती या निमित्ताने सपकाळ यांनी अभिवादन केले.

मालेगाव प्रकरणावर टीका
सपकाळ म्हणाले –

  • मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्यायालयाने निकाल ३१ जुलै रोजी दिला असला तरी “खरा निकाल गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत एक दिवस आधीच दिला होता.”

  • दहशतवादाला धर्म वा रंग नसतो, पण भाजपा दहशतवादाला रंग देऊन अजेंडा राबवत आहे.

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटारडेपणा आणि दुटप्पीपणाचे आरोप करत त्यांनी शपथेचा भंग केला असल्याचे म्हटले.

लाडकी बहीण योजनेवरील टीका

  • सामाजिक व आदिवासी विभागाचा निधी या योजनेसाठी वळवणे हे संविधानाचे उल्लंघन आहे.

  • “हे सरकार चुकीच्या पद्धतीने सत्तेत आले आहे, त्यामुळे चुकीचीच कामे करणार,” असा आरोप त्यांनी केला.

पक्ष सोडून जाणाऱ्यांबद्दल मत

  • “ज्यांना सौदा मिळाला ते गेले, ही गळती नाही. काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. कोणाच्या जाण्याने पक्ष कमजोर होत नाही. ५०-५० वर्षे एकाच कुटुंबात पदे होती, आता नवीन कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे,” असे सपकाळ म्हणाले.

  • “जे गेले त्यांनी दिल्या घरी सुखी रहावे,” अशी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

You Might Also Like

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला

परभणी : फकीरा कादंबरीच्या १०५ प्रतींचे वाटप

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची नांदेड गुरुद्वारास भेट

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आत्मनिर्भरता व स्वबळावरच भारताची प्रगती शक्य – मोहन भागवत
Next Article रायगडच्या राजकारणात शिवसेना-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी?

Latest News

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा
सोलापूर August 2, 2025
सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर August 2, 2025
भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू
देश - विदेश August 2, 2025
नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड
देश - विदेश August 2, 2025
देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?