Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई

admin
Last updated: 2025/08/02 at 4:55 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नागपूर, 2 ऑगस्ट – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपेक्षित शैक्षणिक दर्जाची उंची मिळवत डॉ. आंबेडकर महाविद्यालयाने वंचित समाजासाठी शिक्षणाची दारे खुली करून जीवनात परिवर्तन घडवले. गेल्या ६० वर्षांच्या गौरवशाली परंपरेतून हे महाविद्यालय गुणवत्तेचा प्रवास पुढे नेत नवनवीन शिखरे गाठेल, असा विश्वास व्यक्त करत समाजपरिवर्तनाचे माध्यम म्हणून महाविद्यालय कार्यरत राहावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

दीक्षाभूमी स्मारक समिती संचालित डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या हीरकमहोत्सवी सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डॉ. आंबेडकरांनी दिलेला समतेचा वारसा, संधीची समानता आणि स्वप्ने प्रत्यक्षात उतरविण्याची व्यवस्था पुढे नेणे आवश्यक आहे. धम्मपरिवर्तनाचे कार्य नागपुराच्या मातीत घडले. महाविद्यालयाने वंचितांसाठी शिक्षणाची दारे खुली करून त्यांचे जीवन बदलले. सुरुवातीला केवळ ५ वर्ग खोल्या, ५ शिक्षक आणि ३०० विद्यार्थी असलेले हे महाविद्यालय आज ६ हजार विद्यार्थी, ५० वर्ग खोल्या आणि ४० प्राध्यापकांसह शैक्षणिक उत्कृष्टतेच्या उच्च शिखरावर पोहोचले आहे.

विद्यार्थ्यांनी आंबेडकरांचे विचार अंगीकारावे – भूषण गवई

सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, स्वतःचा विकास साधतानाच समाजातील मागास घटकांना पुढे घेऊन जाणे हा डॉ. आंबेडकरांचा मूलभूत विचार आहे. विद्यार्थ्यांनी हे विचार अंगीकारून ध्येय साध्य करावे. महाविद्यालयाच्या उभारणीत दादासाहेब गायकवाड, दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे, सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान आहे.

१९८१ मध्ये धम्मपरिवर्तनाच्या रौप्यमहोत्सव वर्षी मुंबईहून डॉ. आंबेडकरांच्या अस्थी नागपुरात आल्या तेव्हा शहरवासीयांनी उत्स्फूर्त स्वागत केले, हीच नागपूरच्या सर्वधर्मसमभावाची ओळख असल्याचे ते म्हणाले. त्यांनी कवी सुरेश भट यांच्या ‘भीम वंदना’चे वाचन करून भाषणाचा समारोप केला.

You Might Also Like

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी

कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री

कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे

रायगड : पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
Next Article कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप

Latest News

माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी शिवसेनेची ताकद उभी करावी; उद्धव ठाकरेंकडे मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कृषी विभागाने शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख काम करावे – कृषीमंत्री
महाराष्ट्र August 2, 2025
होटगी रोड विमानतळावर पूर्वीपासूनच नाईट लँडिंग
सोलापूर August 2, 2025
सोलापूर – ई-पीक पाहणी केली तरच मदत मिळणार
सोलापूर August 2, 2025
कांद्याला निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी
महाराष्ट्र August 2, 2025
कर्नाटक : माजी खासदार प्रज्वल रेवन्ना यांना जन्मठेप
Top News August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?