Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार – शशिकांत शिंदे यांची घोषणा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार – शशिकांत शिंदे यांची घोषणा

admin
Last updated: 2025/08/07 at 4:24 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नाशिक, ७ ऑगस्ट –
राज्यातील विरोधी पक्षांचे बालेकिल्ले उद्ध्वस्त करण्याची रणनीती भारतीय जनता पार्टीने आखल्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे. पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी नाशिकमध्ये आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ही घोषणा केली.

मुंबई नाका येथील पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत शिंदे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही, शेतमालाला भाव नाही, आणि राज्य सरकारने दिलेली आश्वासने अपूर्ण आहेत. त्यामुळे नाशिकमध्ये लवकरच महामोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

शिंदे म्हणाले, “राज्यावर कर्जाचा डोंगर आहे. महामार्ग तयार करून विकास होत नाही. पशुखाद्यावर GST लावला जातो, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे सरकारला शेतकऱ्यांची ताकद दाखवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.”

या बैठकीस उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षात सुरू असलेल्या नाराजीची भावना उघडपणे व्यक्त केली. शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला. एका कार्यकर्त्याने तर स्पष्ट विचारले की, “पक्षाच्या आंदोलनात किती नेते सहभागी झाले, हे विचारले पाहिजे. कार्यकर्ते फक्त गर्दीसाठी लागतात का?”

शिंदे यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांनाच संधी देण्यात येईल, असे स्पष्ट केले. “सौभ्यपुरते पदे भोगणाऱ्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवणार,” असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिंदे म्हणाले, “महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे, मात्र अंतिम निर्णय मित्र पक्षांशी चर्चा करून घेतला जाईल. तरीदेखील स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी ठेवावी, असे मी कार्यकर्त्यांना सांगितले आहे.”

You Might Also Like

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आयर्लंडमध्ये ६ वर्षांच्या भारतीय मुलीवर हल्ला; परत जा भारतात, अशी धमकी
Next Article गुजरात हायकोर्टाने आसाराम बापूंच्या तात्पुरत्या जामिनाची मुदत २१ ऑगस्टपर्यंत वाढवली

Latest News

बिहार विधानसभा निवडणूक: एनडीएमध्ये जागावाटपाच्या सूत्रात बदलाची शक्यता
राजकारण October 14, 2025
राहुल गांधींनी घेतली आयपीएस अधिकारी वाय. पुरण कुमार यांच्या कुटुंबाची भेट
देश - विदेश October 14, 2025
चीनमध्ये 4.2 रिश्टर स्केलवर तीव्रतेचा भूकंप
देश - विदेश October 14, 2025
गडचिरोली : नक्षलवादी नेता ‘भूपती’चे 60 सहकाऱ्यांसह आत्मसमर्पण
महाराष्ट्र October 14, 2025
कर्नाटकातील १२ भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घरांवर लोकायुक्तांनी टाकले छापे
देश - विदेश October 14, 2025
शांतता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला एकत्र काम करावे लागेल – लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी
देश - विदेश October 14, 2025
धाराशिव जिल्हा परिषद गट आरक्षण जाहीर; ५५ पैकी २८ जागा महिलांसाठी राखीव
महाराष्ट्र October 14, 2025
धाराशिव : कोटक बँकेचा पूरग्रस्तांना मदतीचा हात
महाराष्ट्र October 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?