Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कुडाळमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही रॅली शांततेत पार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

कुडाळमध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त दोन्ही रॅली शांततेत पार

admin
Last updated: 2025/08/09 at 5:06 PM
admin
Share
1 Min Read
SHARE

सिंधुदुर्ग, 9 ऑगस्ट : गेल्या वर्षीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर यंदा कुडाळ पोलिसांनी सुरुवातीला दोन्ही गटांच्या रिक्षा रॅलीवर निर्बंध घातले होते. मात्र हे निर्बंध नंतर शिथिल करण्यात आले. ठरवलेल्या वेगवेगळ्या वेळेत रॅली सुरू झाल्या असल्या तरी कुडाळ एसटी डेपो जवळ त्या एकत्र आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांचे योग्य नियोजन आणि दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचा समजूतदारपणा यामुळे रॅली शांततेत पार पडली.

नारळी पौर्णिमेनिमित्त रिक्षा रॅली काढण्याची परंपरा कुडाळमध्ये आहे. मात्र, गेल्या वर्षी झालेल्या वादामुळे पोलिसांनी यावर्षी प्रत्येक गटाला फक्त एक रिक्षा घेऊन रॅली काढण्याचा सल्ला दिला. शिवसेना (उबाठा गट) यांनी तो मान्य केला, परंतु शिवसेना (शिंदे गट) यांनी रॅलीचा आग्रह धरला. अखेर सणाच्या आदल्या दिवशी निर्बंध हटवून दोन्ही गटांना वेगवेगळ्या वेळा देण्यात आल्या.

सायंकाळी ४ वाजता शिंदे गटाची रॅली महायुती कार्यालयातून सुरू होऊन एसटी डेपोवर थांबली. सायंकाळी ५ वाजता उबाठा गटाची रॅली त्याच मार्गावरून येऊन एसटी डेपो जवळ थांबली. दोन्ही गट एकमेकांच्या जवळ आल्यानंतर घोषणाबाजी झाली, परंतु पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. शेवटी दोन्ही गटांनी नदीकाठी नारळ अर्पण करून रॅली विसर्जित केल्या.

You Might Also Like

कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी

प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट

सोलापूर-मुंबई-दिल्ली विमान सेवा सुरू करण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

सामाजिक न्याय विभागात राज्यातील महत्त्वपूर्ण प्रश्नांवर सकारात्मक चर्चा – संजय शिरसाठ

शासन वारकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहील – संजय शिरसाठ

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर महापालिकेचा थकबाकीदारांविरोधात अ‍ॅक्शन मोड; 191 जणांच्या मालमत्तेवर बोजा प्रक्रिया सुरू
Next Article आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत कुडाळात शिवसेनेची रिक्षा रॅली

Latest News

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध देशांकडून शुभेच्छा
देश - विदेश August 15, 2025
पंतप्रधान मोदींचा लाल किल्ल्यावरून सर्वात प्रदीर्घ भाषणाचा विक्रम
देश - विदेश August 15, 2025
“न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
देश - विदेश August 15, 2025
कठोर परिश्रम केल्यास जग भारताचं ऐकेल – नितीन गडकरी
महाराष्ट्र August 14, 2025
प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगेंची लातूरमध्ये सदिच्छा भेट
महाराष्ट्र August 14, 2025
भटक्या कुत्र्यांवरील आदेशाला स्थगिती मागणीप्रकरणी निर्णय राखून ठेवला – सर्वोच्च न्यायालय
देश - विदेश August 14, 2025
चर्चेनंतर युद्ध थांबवले नाही तर रशियाला गंभीर परिणाम – ट्रम्प
देश - विदेश August 14, 2025
सर्वोच्च न्यायालयातर्फे माजी न्यायाधीश एल. नागेश्वर राव यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून नियुक्ती
देश - विदेश August 14, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?