Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर; सीमा वादावर होणार द्विपक्षीय चर्चा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

चिनी परराष्ट्र मंत्री वांग यी भारत दौऱ्यावर; सीमा वादावर होणार द्विपक्षीय चर्चा

admin
Last updated: 2025/08/16 at 8:30 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली, १६ ऑगस्ट – भारत सरकारने चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या भारत दौऱ्याची अधिकृत पुष्टी केली असून, या दौऱ्यात भारत-चीन सीमा वादावर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. वांग यी १८ ते १९ ऑगस्टदरम्यान भारतात येणार असून राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांच्या निमंत्रणावर हा दौरा होत आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, वांग यी यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भारत-चीन सीमा प्रश्नावर दोन्ही देशांच्या विशेष प्रतिनिधींमध्ये चोवीसाव्या फेरीची बैठक होणार आहे. या चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व अजित डोभाल करतील, तर चीनकडून वांग यी सहभागी होतील. याशिवाय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर देखील वांग यी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करतील.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या दौऱ्याची पुष्टी केली आहे. त्यांच्या निवेदनानुसार, चीन-भारत सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींची ही चोवीसावी फेरी असणार आहे.

हा दौरा अशा वेळी होत आहे जेव्हा रशियाकडून तेल खरेदी करताना अमेरिका भारतावर ५० टक्के टॅरिफ लावले आहे. भारताने या निर्णयाला अन्यायकारक म्हटले असून, एनएसए डोभाल यांनी नुकताच रशियाचा दौरा करून त्यानंतर वांग यी यांना भारतात आमंत्रित केले होते.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबरदरम्यान चीनमधील तियानजिन येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. मोदी यांचा मागील चीन दौरा २०१८ मध्ये झाला होता. त्यानंतर २०१९ मध्ये शी जिनपिंग भारतात आले होते. पूर्व लडाख सीमावादानंतर तणाव निर्माण झाला असला तरी गेल्या वर्षी रशियातील कजान येथे मोदी-जिनपिंग भेटीनंतर संवाद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

You Might Also Like

रशियाच्या सैनिकी कारखान्यात भीषण स्फोट; ११ ठार, १३० जखमी

बीसीसीआय करणार देशांतर्गत क्रिकेट नियमांमध्ये बदल – गंभीर दुखापतीत बदली खेळाडूला संधी

पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, पूरामुळे 300 हून अधिक मृत्यू

अलास्कामधील ट्रम्प-पुतिन भेटीचे भारताकडून स्वागत

ट्रम्प–पुतिन तीन तासांच्या चर्चेत युद्धबंदीवर तोडगा नाही

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रशियाच्या सैनिकी कारखान्यात भीषण स्फोट; ११ ठार, १३० जखमी
Next Article सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण

Latest News

सोलापूर विद्यापीठ : नापास विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश
सोलापूर August 16, 2025
सोलापुरातील १३४८ सदनिकांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरण
सोलापूर August 16, 2025
रशियाच्या सैनिकी कारखान्यात भीषण स्फोट; ११ ठार, १३० जखमी
देश - विदेश August 16, 2025
मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र August 16, 2025
पत्रकार प्रथमेश कुडेकर हल्ला प्रकरणात तीन आरोपी अटकेत
महाराष्ट्र August 16, 2025
बीसीसीआय करणार देशांतर्गत क्रिकेट नियमांमध्ये बदल – गंभीर दुखापतीत बदली खेळाडूला संधी
देश - विदेश August 16, 2025
दहीहंडी उत्सवातून गोविंदा पथकांचा भारतीय सैन्याला सलाम – मुख्यमंत्री फडणवीस
महाराष्ट्र August 16, 2025
पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस, पूरामुळे 300 हून अधिक मृत्यू
देश - विदेश August 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?