Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : आत्महत्येत दुर्दैवाने महाराष्ट्र अव्वल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्र

जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन : आत्महत्येत दुर्दैवाने महाराष्ट्र अव्वल

Surajya Digital
Last updated: 2020/09/10 at 2:29 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

मुंबई : आत्महत्या खरोखरच देशासमोरचं नवं संकट म्हणून समोर येतंय का? वाढत्या आत्महत्येचे कारणं काय आहेत? अशा अनेक विषयांवर चर्चा झाली. आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस आहे. याच निमित्ताने गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली आहे. यात दुर्दैवाने महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात मागील वर्षात एक लाख 39 हजार 123 जणांनी आत्महत्या केली. आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशात झालेल्या एकूण आत्महत्या पैकी 13.6 टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. तसंच आत्महत्येच्या तुलनेत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तब्बल 40 पट जास्त असते असं एका अभ्यासात आढळून आलं आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मागील वर्षाच्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी आठ लाख लोक आत्महत्या करुन आपलं जीवन संपवतात. म्हणजे जगात दर 40 सेकंदाला एक जण आत्महत्या करत होतो. यावरुन आत्महत्या आणि आत्महत्येचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य वाढत आहे. कौटुंबिक कलह हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण असल्याचंही या अभ्यासातून समोर आलं आहे.

देशातल्या दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महानगरात म्हणजेच मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरु या शहरांमध्ये 36.6 टक्के आत्महत्या झाल्या आहेत.

* गृहिणीची संख्या जादा

2019 मध्ये आत्महत्या करणाऱ्या गृहिणींची संख्या 15.4 टक्के आहे. महाराष्ट्रात 13.6 टक्के लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू 9.7 टक्के, पश्चिम बंगाल 9.1 टक्के, मध्यप्रदेश 9 टक्के आणि कर्नाटकात 8.1 टक्के लोकांनी आत्महत्या केली आहेत. या पाच राज्यात मिळून 49.5 आत्महत्या झाल्या आहेत.

देशात 92 हजार 757 म्हणजे 66.7 टक्के विवाहितांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. तर 32 हजार 852 म्हणजेच 23.6 टक्के अविवाहितांनी आत्महत्या केली आहे.

एक लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या 92 हजार 083 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, याचं प्रमाण 66.2 टक्के आहे. तर एक लाख ते पाच लाख आर्थिक उत्पन्न असलेल्या देशातील 41 हजार 197 जणांनी आत्महत्या केली आहे, त्याचं प्रमाण हे 29.6 टक्के आहे. या अभ्यासानुसार आत्महत्या हे देशासमोरचं नवं संकट म्हणून उभं राहत आहे.

* आत्महत्येची प्रमुख कारणे

– कौटुंबिक आणि वैवाहिक कारणांमुळे 37.9 टक्के आत्महत्या झाल्याचं समोर
– आजारपणातून 17.1 टक्के आत्महत्या
– व्यसनाधीनता 5.6 टक्के आत्महत्या
– प्रेमभंगातून 4.5 टक्के आत्महत्या
– कर्जबाजारीपणामुळे 4.2 टक्के आत्महत्या

* आत्महत्येचे वय

– 18 पेक्षा कमी वर्षे वय – 9612 म्हणजेच 6.9 टक्के
– 18 ते 30 वय – 48 हजार 774 म्हणजे 35.1 टक्के
– 30 ते 45 वयोगटात 44 हजार 287 म्हणजे 31.8 टक्के

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

TAGGED: #आत्महत्या #प्रतिबंधदिन #महाराष्ट्र #अव्वल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मराठा आरक्षणाच्या तात्पुरत्या स्थगितीमुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया लांबणीवर
Next Article कर्जाच्या हफ्त्यांना 28 सप्टेंबरपर्यत अंतरिम सवलत; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?