Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दलित आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारावे – रामदास आठवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Top Newsराजकारण

दलित आघाडीचे नेतृत्व मायावतींनी स्वीकारावे – रामदास आठवले

admin
Last updated: 2025/09/07 at 5:57 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

नवी दिल्ली, 07 सप्टेंबर : दलित राजकारणाच्या एकत्रिकरणासाठी बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

एका मुलाखतीत आठवले म्हणाले की, भविष्यात दलित आघाडी स्थापन झाली, तर तिचे नेतृत्व मायावतींनी करावे. देशातील सर्वच राजकीय पक्ष आज बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. देशातील दलित नेते एकत्र आले, तर एखादा दलित पंतप्रधानही होऊ शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दलित एकतेसाठी ‘नॅशनल दलित फ्रंट’ सारखी मोहीम हवी. पूर्वी रामविलास पासवान, उदित राज आणि आठवले यांनी ‘नॅशनल दलित फ्रंट’च्या माध्यमातून एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. दलित राजकारणाच्या एकतेसाठी मायावती एक पाऊल पुढे आल्या, तर मी 10 पावले मागे जाईन असे नमूद करत आठवले यांनी एकजुटीचे आवाहन पुन्हा केले.

लोकसभेत रिपाईचा एकही खासदार नसतानाही पंतप्रधान मोदींनी मला सलग तिसऱ्यांदा मंत्रीपद दिले. भाजप आणि एनडीएने मला मान दिला, त्यामुळे मी पक्ष देशभरात वाढवू शकलो असेही त्यांनी नमूद केले. त्याचवेळी “प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपेल” या भाजप नेत्याच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, “हा दावा तथ्यहीन आहे. प्रादेशिक पक्षांची गरज आणि अस्तित्व कायम राहिल असा दावा त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस सर्वसमावेशक नेते

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास व्यक्त करत आठवले म्हणाले की, “फडणवीस हे सर्व वर्गांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्या विरोधात कटकारस्थान सुरु आहे, पण त्यांनी आताही आपले सर्वसमावेशक नेतृत्व दाखवले.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी पहिली मागणी मी केली होती. मात्र ओबीसी, अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे.” त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने दिलेल्या 10 टक्के आर्थिक आरक्षणाच्या निर्णयाचे समर्थन केले. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीला आठवलेंनी पाठिंबा दर्शवला आहे.

मतचोरीच्या आरोपांवर आठवलेंची टीका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतचोरीचे आरोप केल्यावर आठवले म्हणाले की, “लोकशाहीत मतदानाची चोरी होणे शक्य नाही. आम्ही आमच्या पराभवाला मतचोरी कारणीभूत आहे, असे कधीच म्हणालो नाही. मतदान प्रक्रियेबाबत राहुल गांधींचे आरोप निराधार आणि दिशाभूल करणारे आहेत.” राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका करत आठवले म्हणाले, “पंतप्रधान मोदी कधीही राहुल गांधींचे नाव घेत नाहीत, पण राहुल गांधी मात्र 24 तास मोदींवर टीका करत असतात. त्यांनी खूप शक्ती एकत्र करून प्रयत्न केला, पण पंतप्रधान मोदींचा पराभव करू शकले नाहीत असा टोलाही आठवलेंनी लगावला.

You Might Also Like

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे

स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री

आपल्या कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी नेत्यांनी घ्यावी – एकनाथ शिंदे

हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही – एकनाथ शिंदे

पुणे – पालिकेच्या पाणी मीटर मोहिमेत अडथळा आणल्यास गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मनोज जरांगे यांची धनंजय मुंडेंवर टीका
Next Article उद्योग-व्यवसायासाठी १५ लाखांचे कर्ज देण्याचा निर्णय-मुख्यमंत्री

Latest News

उद्धव ठाकरेंनीच भुमरे पिता-पुत्रांना घडवले – अंबादास दानवे
राजकारण October 11, 2025
मविआचे शिष्टमंडळ 14 ऑक्टोबरला घेणार निवडणूक आयोगाची भेट
महाराष्ट्र October 11, 2025
इंडिगोच्या विमानाची विंडशील्ड तुटली; 76 प्रवासी बचावले
देश - विदेश October 11, 2025
बीएलएने जामरानमध्ये पाक सैन्याला रसद पुरवठ्यावर घातली बंदी
महाराष्ट्र October 11, 2025
अमरावतीत गोवंश तस्करांचा ट्रक पकडला; १८ लाखांची २९ जनावरे ताब्यात
महाराष्ट्र October 11, 2025
लाडक्या बहिणी झाल्या त्रस्त; योजनेत ई-केवायसीचा गोंधळ
महाराष्ट्र October 11, 2025
आयपीएल लिलाव १३ ते १५ डिसेंबर दरम्यान होण्याची शक्यता
खेळ October 11, 2025
स्थानिक स्वराज्य निवडणुका 15 नोव्हेंबर नंतर कामाला लागा – मुख्यमंत्री
राजकारण October 11, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?