Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: लालबाग राजा मंडळ वाडकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

लालबाग राजा मंडळ वाडकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा करणार

admin
Last updated: 2025/09/09 at 4:36 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 9 सप्टेंबर : लालबागचा राजा विसर्जन 2025 मधील घडामोडी आता न्यायालयीन चौकटीत गेल्या आहेत. मुंबईतील गिरगाव चौपाटीवरील विसर्जनाबाबत खोटी माहिती पसरवल्याचे आरोप करून लालबाग राजा मंडळाने हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा लालबागच्या राजाचं विसर्जन तब्बल 33 तासांनंतर पार पडले. 6 सप्टेंबर दुपारी सुरू झालेली मिरवणूक 7 सप्टेंबरच्या रात्री उशिरा अखेर गिरीगाव चौपाटीवर संपली. विसर्जनासाठी गुजरातमध्ये बनवलेल्या मोटराइज्ड तराफ्याचा वापर करण्यात आला, मात्र मूर्तीवर काम करणं अत्यंत किचकट ठरल्याने वेळखाऊ प्रक्रिया झाली.

हिरालाल वाडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं की, ‘‘आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबाग राजाचे विसर्जन करत आलो आहोत. यंदा मात्र मंडळाने गुजरातच्या कंपनीला कंत्राट दिलं आणि गणित चुकलं. भरती ओहीटीचा अंदाज लालबाग मंडळाला आला नाही. मंडळाने पुढे विसर्जनाची योग्य काळजी घ्यावी.’’

लालबाग राजा मंडळाने स्पष्ट केले की, हिरालाल वाडकर मंडळाशी कधीही संबंधित राहिलेले नाहीत आणि कधीच त्यांनी राजाचे विसर्जन केलेले नाही.त्यांनी फक्त प्रसिद्धी आणि बदनामीसाठी चुकीची माहिती पसरवली. यामुळे मंडळाने वाडकर यांच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.मंडळाने हा निर्णय आज घेतला असून उद्या म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी न्यायालयात हा दावा दाखल केला जाणार आहे.

लालबागच्या राजाच्या विसर्जनात भव्य भाविकांची उपस्थिती होती, तरीही 33 तासांच्या रखडलेल्या प्रक्रियेमुळे लाखो भाविकांना संयम धरण्याची गरज भासली. मंडळाने सांगितले की, भविष्यात विसर्जनाची काळजी अधिक नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात येईल.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article भारत सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो – पंतप्रधान मोदी
Next Article नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?