Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
राजकारण

मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा मला नैतिक अधिकार नाही : शरद पवार

admin
Last updated: 2025/09/18 at 6:10 PM
admin
Share
3 Min Read
SHARE

कोल्हापूर, 18 सप्टेंबर – माझ्या 75 व्या वाढदिवसाला नरेंद्र मोदी स्वतः आले होते. नरेंद्र मोदींनी राजकारण आणलं नाही, आम्हीही आणत नाही. तसेच आता मी वयाच्या ७५ वर्षांनंतर थांबलो नाही, तर मला मोदींना थांबायला सांगण्याचा, बोलायचा नैतिक अधिकार नाही. असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान पंचाहत्तरीनंतर थांबू असे बोललोच नव्हतो, असं काही लोक म्हणतायत, हेही सांगायला ते विसरले नाहीत. मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा आहेत आणि देशासाठी त्यांना जे काही करायचे आहे, ते त्यांनी योग्य करावे, अशी सदिच्छाही व्यक्त केली.

महापालिका निवडणुका आणि पक्षीय बांधणीच्या अनुषंगाने पवार आज सकाळी कोल्हापूरात पोहोचले. त्यानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवरायांबद्दल आपण सगळेच आदर व्यक्त करतो. एकदा शिवरायांनी दुष्काळानंतरच्या पावसात सोन्याचा नांगर केला. सोन्याचा नांगर वापरून शिवरायांनी एक संदेश दिला. सध्या शेतीचं नुकसान झालंय. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली, शेतीचं नुकसान झालंय. जमिनी वाहून गेल्या, सोयाबीन उद्ध्वस्त झालं. सरकार पंचनामे कधी करतंय, मदत कधी पोहोचतेय, देवाभाऊंनी पंचनामे आणि मदतीकडे लक्ष द्यावं, असंही पवार म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबत भाष्य करताना ते म्हणाले, सगळीकडंच मविआची युती असेल, असं नाही. स्थानिक समीकरणं बघून निर्णय घेऊ. काही ठिकाणी एकत्र लढू, काही ठिकाणी स्वतंत्र लढू. ठाकरे बंधू एकत्र येऊन ताकद वाढली तर चांगलंच आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ठाकरेंची ताकद, शक्ती आहे. मुंबई, ठाण्यात ठाकरेंनी जास्त जागा मागण्यात गैर काही नाही, असंही पवार म्हणाले.

हैदराबाद गॅझेट एक दिशा दाखवणारं आहे. मला स्वतःला हैदराबाद गॅझेटबद्दल माहिती नव्हती. आपल्यातली एकीची वीण उसवू नये. कटुता वाढू नये, सुसंवाद वाढावा. सरकारने मराठा आणि ओबीसींची समिती स्थापन केली. दोन्ही समित्यांत एकाच जातीचे सदस्य आहेत. ऐक्य घडवायचं तर समित्यांत एकाच जातीचे लोक का?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. परभणी, बीड, धाराशिवमध्ये मराठा-ओबीसींमध्ये कटुता वाढली. एकमेकांच्या हॉटेलातही जायचं नाही अशी कटुता वाढलीय. 1994 साली हा आरक्षणाचा प्रश्नच नव्हता. विविध समाजाला लाभ व्हावा म्हणून मंडल अहवालावर निर्णय घेतले. मंडल आयोगाच्या अहवालावर सर्वांनी मिळून निर्णय घेतले. कटुता टाळण्याला मला हातभार लावायचा आहे. देशात आरक्षणाचा विचार कोल्हापुरातून निर्माण झाला. माझ्या मते शाहू महाराजांचा व्यापक हेतू आजही ठेवायला हवा, असं मतही व्यक्त केलं.

निवडणूक आयोगाच्या काही निर्णयावर देशात नाराजी आहे. 300 खासदारांनी प्रथमच निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. 300 खासदार रस्त्यावर येतात ही दुर्लक्ष करणारी बाब नाही. निवडणूक आयोगानं आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. 300 खासदार मोर्चा काढतात ही लहान-सहान गोष्ट नाही. तसेच खासदारांसोबत बैठकीलाही अटी तटी घालणं योग्य नाही. राहुल गांधी मतदारसंघनिहाय काय गडबड झाली ते सांगतायत. राहुल गांधींच्या आरोपानंतर आयोगानं आपली विश्वासार्हता वाढवावी. राहुल गांधींच्या आरोपानंतरही आयोग खबरदारी घेताना दिसत नाही. निवडणूक प्रक्रियेवरचा लोकांचा विश्वास आयोगानं वाढवावा. राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बची मीही वाट बघतोय, असंही पवारांनी सांगितले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

फडणवीस भेटीनंतर दिलीप माने यांची जोरदार हल्लेबाजी; “सपकाळांना माझी ओळख नाही!”

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article निवडणूक आयोग देशभर ‘एसआयआर’ प्रक्रिया राबविणार
Next Article महिला एकदिवसीय विश्वचषक : भारतीय संघाची विजयी सलामी

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?