Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: शिवसेना हा अत्यंत ‘कनफ्युज’ पक्ष; लोकसभेत आणि राज्यसभेत वेगळी भूमिका, शिवसेनाला सवयच
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

शिवसेना हा अत्यंत ‘कनफ्युज’ पक्ष; लोकसभेत आणि राज्यसभेत वेगळी भूमिका, शिवसेनाला सवयच

Surajya Digital
Last updated: 2020/09/21 at 10:15 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

नागपूर : शिवसेना हा अत्यंत कनफ्युज पक्ष आहे, अशी टीका आता माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कृषी विधेयकावरुन त्यांना प्रश्न विचारले असता शिवसेनेबाबतची भूमिका मांडली. लोकसभेत आणि राज्यसभेत वेगळी भूमिका असल्याची टीका फडणवीसांनी केली.

‘देवेंद्रजी शिवसेनेनेही या विधेयकांना विरोध दर्शवला आहे. खासदार संजय राऊत यांनी यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी केली. जर ही विधयेकं एवढी चांगली आहेत तर देशात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही अशी खात्री भाजपा देऊ शकेल का?’ या प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* शिवसेनेला सवयच आहे

शिवसेना हा कनफ्युज पक्ष आहे. याचं कारण लोकसभेतली त्यांची भूमिका वेगळी होती आणि राज्यसभेतली त्यांची भूमिका वेगळी आहे. पण यात नवल काही नाही. शिवसेनेला ही सवयच आहे. ते आमच्यासोबत जेव्हा सत्तेत होते तेव्हा ते सत्तेतही सहभागी होते आणि विरोधी पक्षाची भूमिकाही बजावत होते. त्यामुळे ते लोकसभेत ते वेगळं बोलतात आणि राज्यसभेत वेगळं बोलतात. जे समर्थन करतात त्यांच्यात गेलं तर ते सांगतात आम्ही लोकसभेत समर्थन दिलं आहे. जे विरोध करतात त्यांच्यात गेलं तर सांगतात आम्ही राज्यसभेत विरोध केलाय.

* शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने ठाम भूमिका घ्यावी

खरं म्हणजे शिवसेनेने आधी भूमिका ठरवली पाहिजे. शेती संदर्भात शिवसेनेने कधी भूमिका मांडलेली नाही. मला आता त्यांना आव्हान करायचं आहे की, महाराष्ट्रात त्यांचं सरकार आहे तर त्यांनी गॅरंटी घ्यावी ना, एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही. त्यांच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या का झाल्या? याचं उत्तर संजय राऊत देतील का? उगाच शेतकरी प्रश्नावरुन राजकारण करायचं ही गोष्ट सोडली पाहिजे. शेतकऱ्यांबाबत शिवसेनेने आधी एक ठाम भूमिका घेतली पाहिजे असं आमचं मत आहे.

* काँग्रेसचा चेहरा उघड झाला आहे

कृषी विधेयकांवरुन काँग्रेस करत असलेलं आंदोलन ही काँग्रेसची लबाडी आहे, अशी टीका आधी त्यांनी केली. या विधेयकांचं आश्वासन काँग्रेसनेच आधी दिलं होतं. आता विरोध करत असल्याने काँग्रेसचा चेहरा उघड झाला,

याशिवाय त्यांनी काँग्रेसवरही कडाडून टीका केली. तसंच राहुल गांधी यांच्यावरही टीका केली. राहुल गांधी यांनी लोकसभेच्या वेळी काँग्रेसचा जो जाहीरनामा होता तो वाचला नाही. कारण तो वाचला असता तर त्यांनी मोदी सरकारवर कृषि विधेयकांवरुन आरोप केलेच नसते. असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #शिवसेना #कन्फ्युज #पक्ष #लोकसभा #राज्यसभा #वेगळी #भूमिका #फडणवीस #टीका
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अकलूजमध्ये शंभर टक्के उस्फूर्त प्रतिसाद; विविध संघटनांनी दिला पाठिंबा
Next Article ज्येष्ठ अभिनेत्या आशालता यांचे निधन; सेटवरील 27 जणांना ‘कोरोना’

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?