Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: पदवी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील जनहित याचिकेवर ३१ जुलैला निर्णय
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

पदवी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधातील जनहित याचिकेवर ३१ जुलैला निर्णय

Surajya Digital
Last updated: 2020/07/18 at 2:19 PM
Surajya Digital
Share
1 Min Read
SHARE

मुंबई : आर्ट्स, कॉमर्स, सायन्स यासारख्या अव्यावसायिक शाखांतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या अंतिम सत्र आणि अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधातील जनहित याचिकेवर आता ३१ जुलैला अंतिम सुनावणी होणार आहे.

दरम्यान, या याचिकेत राज्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व केंद्रीय गृह मंत्रालयाला प्रतिवादी करण्याचे निर्देश मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता व न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने दिले आहेत.

‘राज्य सरकारचा निर्णय हा विद्यापीठ अनुदान कायदा तसेच महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यातील तरतुदींशी विसंगत आहे. राज्य सरकारला परीक्षा रद्द करण्याचा अधिकारच नाही. त्यामुळे तो रद्द करण्याचा यावा’, अशी विनंती पुण्यातील निवृत्त शिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत केलेल्या तातडीच्या याचिकेत केली आहे.

याचिकेला विरोध दर्शवून सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणारे दोन अर्ज महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन आणि अविरुप मंडल व अन्य काहींनी दाखल केले. त्याची दखल घेऊन खंडपीठाने त्यांना याचिकेत प्रतिवादी करून घेतले. त्याचबरोबर विद्यापीठ अनुदान आयोगाला याप्रश्नी प्रतिज्ञापत्र करायचे असल्यास एक आठवड्यात करावे आणि राज्य सरकारच्या प्रतिज्ञापत्राला याचिकादारांना उत्तर द्यायचे असल्यास एक आठवड्यात आपले प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असे निर्देश देऊन खंडपीठाने पुढील सुनावणी ३१ जुलैला ठेवली आहे.

You Might Also Like

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी

तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी – विजय वडेट्टीवार

मुंबई-ठाण्यात मुसळधार पावसाचा कहर; वाहतुकीवर मोठा परिणाम

राज्यात मुसळधार पावसाचा कहर; अनेक नद्या धोक्याच्या पातळीवर

मुंबई महापालिकेत भाजपाचाच झेंडा फडकणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

TAGGED: #पदवीपरीक्षा #जनहितयाचिका #सुनावणी #विद्यापीठअनुदानकायदा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या सोलापुरात
Next Article कोविडसाठी महाविद्यालय देण्यास नकार दिल्यामुळे प्राचार्यावर गुन्हा दाखल

Latest News

बिहारचा औंठा-सिमारिया ६ पदरी पूल पूर्ण; २२ ऑगस्टला पंतप्रधान करतील उद्घाटन
देश - विदेश August 18, 2025
वंदे भारतला जोडणार चार डबे; ३१२ प्रवाशांना अतिरिक्त सुविधा
सोलापूर August 18, 2025
अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-रत्नागिरी रोडवर वाहतूक कोंडी
महाराष्ट्र August 18, 2025
संजय राऊत राहुल गांधींचे पगारी नोकर बनले – नवनाथ बन
राजकारण August 18, 2025
मुनीरच्या वक्तव्याला पाकिस्तानी गृहमंत्र्यांची दुजोरी
देश - विदेश August 18, 2025
भारत-पाकिस्तान परिस्थितीवर अमेरिका दररोज लक्ष ठेवून – परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ
देश - विदेश August 18, 2025
तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी – विजय वडेट्टीवार
महाराष्ट्र August 18, 2025
नवनीत राणांचा पाकिस्तानवर हल्लाबोल
राजकारण August 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?